शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

परिवहन विभागाच्या आदेशाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:25 IST

विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्व शाळांना दिले.

ठळक मुद्देपरिवहन समित्यांची स्थापनाच नाही : शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्व शाळांना दिले. मात्र जिल्ह्यातील १०७२ शाळांपैकी ९०० वर शाळांमध्ये परिवहन समित्यांची अद्यापही स्थापना करण्यात आली नसल्याचीे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.स्कूल बसचे वाढते अपघात, स्कूल बसेसमध्ये अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. सध्या पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. खासगी शाळा या शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असल्याने घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केली आहे. बहुतेक खासगी शाळांच्या स्वत:च्या स्कूल बसेस आहेत. यासाठी शाळांकडून शुल्क देखील आकारले जाते. विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभागाने काही नियम लागू केले आहे.या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती आणि शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, पोलीस निरीक्षक, स्थानिक प्रतिनिधी यांचा समावेश असलेली शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीची स्थापना करणे सर्वच शाळांना अनिवार्य करण्यात आली.त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे दिली. समितीची सभा दर तीन महिन्यातून एकदा तसेच शाळेचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी घेण्याचा नियम आहे. प्रत्येक शाळेत या समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे. अन्यथा शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाईची देखील तरतूद आहे. गोंदिया जिल्ह्यात १०७२ शाळा आहेत.यापैकी ९०० वर शाळांमध्ये अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी या समित्यांची स्थापना करण्यात आली नसल्याची बाब पुढे आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा गाजत असताना शिक्षण विभागाने अद्यापही हा मुद्दा गांर्भियाने घेतलेला नाही. किती शाळांमध्ये शालेय परिवहन समित्यांची स्थापना झाली नाही. याचा साधा आढावा देखील घेण्यास या विभागाकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबतीत शिक्षण विभाग कितपत गंभीर हे देखील दिसून येते.काय आहे समितीची जबाबदारीशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे, स्कूल बसच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, अग्निशमन, प्रत्येक स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी आहे, किंवा नाही. यासर्व गोष्टींची पडताळणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीची आहे.जिल्ह्यात ३१३ स्कूल बसेसजिल्ह्यातील खासगी शाळांकडे ३१३ स्कूल बसेस असून त्यांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र अलीकडे स्कूल बसेसच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुढे आहे. मात्र स्कूल बसेसची पाहणी करुन नियमांचे योग्य पालन होते आहे अथवा नाही. हे पाहण्यासाठी शालेय परिवहन समित्याच नसल्याने यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.