शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

परिवहन विभागाच्या आदेशाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:25 IST

विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्व शाळांना दिले.

ठळक मुद्देपरिवहन समित्यांची स्थापनाच नाही : शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्व शाळांना दिले. मात्र जिल्ह्यातील १०७२ शाळांपैकी ९०० वर शाळांमध्ये परिवहन समित्यांची अद्यापही स्थापना करण्यात आली नसल्याचीे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.स्कूल बसचे वाढते अपघात, स्कूल बसेसमध्ये अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. सध्या पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. खासगी शाळा या शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असल्याने घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केली आहे. बहुतेक खासगी शाळांच्या स्वत:च्या स्कूल बसेस आहेत. यासाठी शाळांकडून शुल्क देखील आकारले जाते. विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभागाने काही नियम लागू केले आहे.या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती आणि शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, पोलीस निरीक्षक, स्थानिक प्रतिनिधी यांचा समावेश असलेली शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीची स्थापना करणे सर्वच शाळांना अनिवार्य करण्यात आली.त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे दिली. समितीची सभा दर तीन महिन्यातून एकदा तसेच शाळेचे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी घेण्याचा नियम आहे. प्रत्येक शाळेत या समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे. अन्यथा शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाईची देखील तरतूद आहे. गोंदिया जिल्ह्यात १०७२ शाळा आहेत.यापैकी ९०० वर शाळांमध्ये अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी या समित्यांची स्थापना करण्यात आली नसल्याची बाब पुढे आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा गाजत असताना शिक्षण विभागाने अद्यापही हा मुद्दा गांर्भियाने घेतलेला नाही. किती शाळांमध्ये शालेय परिवहन समित्यांची स्थापना झाली नाही. याचा साधा आढावा देखील घेण्यास या विभागाकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबतीत शिक्षण विभाग कितपत गंभीर हे देखील दिसून येते.काय आहे समितीची जबाबदारीशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे, स्कूल बसच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, अग्निशमन, प्रत्येक स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी आहे, किंवा नाही. यासर्व गोष्टींची पडताळणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीची आहे.जिल्ह्यात ३१३ स्कूल बसेसजिल्ह्यातील खासगी शाळांकडे ३१३ स्कूल बसेस असून त्यांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र अलीकडे स्कूल बसेसच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुढे आहे. मात्र स्कूल बसेसची पाहणी करुन नियमांचे योग्य पालन होते आहे अथवा नाही. हे पाहण्यासाठी शालेय परिवहन समित्याच नसल्याने यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.