शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

सणासुदीच्या काळातही रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना दहा दिवस मनस्ताप !

By अंकुश गुंडावार | Updated: August 29, 2022 23:56 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे.सणासुदीच्या काळातही रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना दहा दिवस मनस्ताप !

गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रुळावर आले नसून त्यातच आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईन आणि इंटर लॉकिंगच्या कामामुळे ३० ते ५ सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक्सप्रेस आणि लोकल गाड्या ९ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहे. तर ३० ते ५ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ही नागपुरवरुनच सुटणार आहे. एकूण ५८ रेल्वे गाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे. तर यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानी ते तुमसररोड व काचेवानी रेल्वे स्थानकापर्यंत थर्ड लाईन आणि इंटरलॉकिंग व नाॅन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे २२ नियमित आणि ३६ साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ३० ते ५ सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग स्पेशल, गोंदिया-इतवारी, गोंदिया-इतवारी मेमू, रायपूर-इतवारी स्पशेल, इतवारी-रायपूर, कोरबा-इतवारी, इतवारी-बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालीमार एक्सप्रेस, अमृतसर-कोरबा एक्सप्रेस, कोरबा-अमृतसर एक्सप्रेस, हावडा मेल, मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद, अहमदाबाद-हावडा,आझाद हिंद एक्सप्रेस, एलटीटी शालीमार एक्सप्रेस, सिंकदराबाद-रायपूर, रायपूर-सिंकदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रीवा इतवारी, पुरी -गांधीधाम, गांधीधाम -पुरी, पोरबंदर या गा गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे