शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

तब्बल ७० दिवसानंतर गोंदिया रेल्वे स्थानकावरुन धावली ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी १५६ आक्षरण तिकीटांची विक्री : रेल्वे स्थानक परिसरात दिसली वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाल्याने केंद्र सरकारने २२ मार्चला जनता का कफ्यू जाहीर केला होता. त्यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. तर प्रथमच रेल्वे वाहतूक सुध्दा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तब्बल ७० दिवस रेल्वेची प्रवाशी वाहतूक सेवा बंद होती. त्यानंतर सोमवारी (दि.१) काही मोजक्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरुन ७० दिवसानंतर तीन प्रवाशी गाड्या सोमवारी सोडण्यात आल्या.रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सर्व प्रवाशांना सॅनिटाईझ करुन त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता लिहिल्यानंतर फलाटावर सोडण्यात येत होते. काही प्रवाशांना मास्कचे सुध्दा वाटप करण्यात आले.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे विभागाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोमवारी गोंदिया रेल्वे स्थानकावरुन जनशताब्दी एक्सप्रेस,अहमदाबाद-हावडा, हावडा-मुंबई या तीन रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे ७० दिवसानंतर प्रथमच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची थोडीफार वर्दळ आढळली. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण केंद्र सुध्दा बंदच होते ते सोमवारी उघडण्यात आले. पहिल्याच दिवशी १५६ प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज १५० प्रवाशी गाड्यांची ये-जा होते. तर दररोज २५ हजार प्रवाशी प्रवास करतात. मात्र लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने येथील रेल्वे स्थानकावर मागील ७० दिवस पूर्णपण शुकशुकाट होता. सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरु झाल्याने प्रथमच प्रवाशांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :railwayरेल्वे