शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने चालविला हरभरा पिकावर ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : लागवड खर्च निघणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : यंदा रब्बी हंगामात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा या पिकांना बसला. अवकाळी पावसामुुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरातील हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याचा प्रकार सोमवारी (दि.६) उघडकीस आला.कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई राहत असल्याने या कालावधीत वांग्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे मागील पंधरा दिवसांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. परिणामी अनेक नियोजित विवाह सोहळे सुध्दा रद्द करण्यात आले आहे. तर शेतमालाची वाहतूक करण्यासाठी साधने मिळत नसल्याने आणि ग्राहकांची मागणी कमी झाली असल्याने या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यंदा सातत्याने नैसर्गिक संकट कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.दर आठ दिवसांनी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांची शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरमधील हरभरा पिकांवर सोमवारी ट्रॅक्टरने नांगर फिरविला. कोरे यांनी पाच एकरमध्ये हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च केले. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण पाच एकरातील हरभरा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्यानेच त्यांनी पाच एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविल्याचे सांगितले.कोरे यांच्याप्रमाणेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची हीच स्थिती असून शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.