शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पुजारीटोला धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता.

ठळक मुद्देनियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष : सुरक्षा विषयक उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यात मागील तीन चार दिवस झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरण देखील भरले असून या धरणाचे ६ दरवाजे सोमवारी (दि.२४) उघडण्यात आले. त्यामुळे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी धरणाच्या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी होत आहे. मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोनामुळे यंदा मागील पाच महिन्यांपासून सर्वच पर्यटन स्थळी शुकशुकाट आहे. तरी नागरिकांना सुध्दा अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येत नाही. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यंदा जून, जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने हाजराफॉल, नवेगावबांध, पुजारीटोला, सिरपूरबांध या पर्यटनस्थळ परिसरात शुकशुकाट होता. मात्र जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे हाजराफॉल व पुजारीटोला परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.सध्या कोरोनाचा संक्रमण सुरू असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगण्याची गरज आहे. पण पर्यटकांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पर्यटक बिनधास्तपणे धरणातील पाण्यात जावून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण संबंधित विभागाचे सुध्दा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.धरण स्थळी सुरक्षा व्यवस्थेचा अभावपुजारीटोला येथील धरणस्थळी मागील दोन तीन दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यटक नियमांचे पालन न करता धरणातील पाण्यात जावून जीव धोक्यात घालून सेल्फी घेत आहे. मात्र येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त व सुरक्षा रक्षकांची सुध्दा नियुक्ती सिंचन विभागाने केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडल्यास या जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.सेल्फी घेणे बेतू शकते जीवावरपुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. तर काही अतिउत्साही पर्यटकांना आपला मोह आवरत नसून ते धरणाच्या पाण्यात जावून सेल्फी घेत आहेत.त्यामुळे हा प्रकार धोकादायक असून यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटन