शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘बाघ’चे उन्हाळी नियोजन कोलमडले

By admin | Updated: December 25, 2014 23:33 IST

जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या

केवळ ९६१ हेक्टरला लाभ : गतवर्षीच्या तुलनेत सहापटीने घटगोंदिया : जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यावर्षी सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. केवळ ९६१ हेक्टरमध्ये रबी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे नियोजन सहा पटींनी कमी आहे.बाघ कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत यावर्षीच्या रबी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ४४२ हेक्टरला, आमगाव तालुक्यात २९८ हेक्टरला तर सालेकसा तालुक्यात २०६ हेक्टरला असे एकूण ९६१ हेक्टरला बाघ प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. गेल्यावर्षी याच बाघ प्रकल्पातून ६००० हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे ७५४५ हेक्टरला सिंचन करण्यात आले. यावर्षी मात्र परिस्थिती अगदी विपरित आहे.यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांसाठी पाणी सोडावे लागले. त्यामुळे आधीच पाण्याची पातळी कमी असताना जलसाठाही अपुरा झाला. त्यामुळे रबी हंगामासाठीचे नियोजन पार कोलमडून गेले. गतवर्षीच्या तुलनेत एकदम सहा पटीने सिंचन क्षेत्र कमी करावे लागले. गेल्यावर्षी १०८.७६ दलघमी जलसाठा होता. मात्र यावर्षी केवळ १७.४९ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेले पाणी मिळविण्यासाठी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीचा भरणा करावा, तसेच उन्हाळी हंगाम २०१४-१५ ची आगाऊ पाणीपट्टी रक्कम भरावी. तसेच सुरळीत ओलीत होण्याच्या दृष्टीने आपल्या शेतातील पाटचाऱ्या साफ, स्वच्छ व प्रवाहक्षम करून ठेवाव्या, तसेच पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी केल्या आहेत.बाघ व्यवस्थापन शाखा सालेकसा, आमगाव आणि पुजारीटोला येथील विद्युत पंपधारकांसाठी दिलेल्या मंजूर क्षेत्राच्या अर्ध्या क्षेत्रात उन्हाळी धानपिक घेण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र कामठा व कालीमाटी शाखेतील पंपधारकांना या हंगामात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, असे बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)