शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

By कपिल केकत | Updated: February 24, 2024 20:43 IST

परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

गोंदिया : एकीकडे उकाडा वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा व गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातारण निर्माण होत असल्याने तापमानात घट झालेली आहे. त्यात आता गारपीट व पावसामुळे पिकांना धोका निर्माण होणार असून बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील. परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच थंडीचा जोर कमी झाला असून उकाडा वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून तर तापमान ३३ अंशावर जात आहे. यावरून मार्च महिन्यातील स्थितीचा अंदाज लावूनच अंगाला घाम फुटत आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात १० व ११ तारखेला बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. तर आता हवामान खात्याने २५, २६ व २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात गारपीट व सोसाट्याचा वारा सुटणार असा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याचा हा अंदाज विदर्भात सर्वच जिल्ह्यांसाठी वर्तविण्यात आला आहे. तर त्यानुसार, मधामधात ढग दाटून येत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

हवामान खात्याचा अंदाज माहिती होताच शेतकरी व सर्वसामान्यांचे ही टेन्शन वाढले आहे. कारण, गारपीट, सोसाट्याचा वारा व पाऊस झाल्यास रब्बी पिकांना त्यापासून धोका निर्माण होणार आहे. तर पाऊस बरसल्यास वातावरणात परत एकदा बदल होणार व आरोग्याच्या तक्रारी वाढणार यात शंका नाही. अगोदरच सर्दी, खोकला व तापाने जिल्हावासी त्रस्त आहेत. त्यात आता परत पाऊस बरसल्यास त्यात आणखी भर पडणार आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो की काय याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हरभरा व गव्हाला धोका- जिल्ह्यात सध्या १६०० हेक्टरमध्ये गहू आणि ५७०८ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. गव्हाचे पीक फुलोरा ते दाण्याच्या दुधा अवस्थेत आले आहे. तर हरभरा सुद्धा दाण्यावर आला आहे. अशात गारपीट व सोसाट्याचा वारा तसेच पाऊस झाल्यास मात्र गहू व हरभरा जमिनीवर लोळणार व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासह अन्य पिकांनाही धोका निर्माण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन परत एकदा वाढले आहे.

ढगाळ वातावरणाने पारा घसरला- मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंशावर गेले होते. मात्र आता ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले असून ३० अंशावर आले आहे. सध्या सकाळी व रात्री थंडी जाणवत असून दुपारी मात्र उकाडा वाढत आहे. वातावरणातील हा बदल लहान व वृद्धांसाठी नव्हे तर तरूणाईसाठी सर्दी, खोकला व तापाने ग्रासत आहे. 

टॅग्स :weatherहवामान