शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

By कपिल केकत | Updated: February 24, 2024 20:43 IST

परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

गोंदिया : एकीकडे उकाडा वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आता हवामान खात्याने पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा व गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून ढगाळ वातारण निर्माण होत असल्याने तापमानात घट झालेली आहे. त्यात आता गारपीट व पावसामुळे पिकांना धोका निर्माण होणार असून बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढतील. परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच थंडीचा जोर कमी झाला असून उकाडा वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून तर तापमान ३३ अंशावर जात आहे. यावरून मार्च महिन्यातील स्थितीचा अंदाज लावूनच अंगाला घाम फुटत आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात १० व ११ तारखेला बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. तर आता हवामान खात्याने २५, २६ व २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात गारपीट व सोसाट्याचा वारा सुटणार असा अंदाज वर्तविला आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याचा हा अंदाज विदर्भात सर्वच जिल्ह्यांसाठी वर्तविण्यात आला आहे. तर त्यानुसार, मधामधात ढग दाटून येत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

हवामान खात्याचा अंदाज माहिती होताच शेतकरी व सर्वसामान्यांचे ही टेन्शन वाढले आहे. कारण, गारपीट, सोसाट्याचा वारा व पाऊस झाल्यास रब्बी पिकांना त्यापासून धोका निर्माण होणार आहे. तर पाऊस बरसल्यास वातावरणात परत एकदा बदल होणार व आरोग्याच्या तक्रारी वाढणार यात शंका नाही. अगोदरच सर्दी, खोकला व तापाने जिल्हावासी त्रस्त आहेत. त्यात आता परत पाऊस बरसल्यास त्यात आणखी भर पडणार आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो की काय याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हरभरा व गव्हाला धोका- जिल्ह्यात सध्या १६०० हेक्टरमध्ये गहू आणि ५७०८ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे. गव्हाचे पीक फुलोरा ते दाण्याच्या दुधा अवस्थेत आले आहे. तर हरभरा सुद्धा दाण्यावर आला आहे. अशात गारपीट व सोसाट्याचा वारा तसेच पाऊस झाल्यास मात्र गहू व हरभरा जमिनीवर लोळणार व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासह अन्य पिकांनाही धोका निर्माण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन परत एकदा वाढले आहे.

ढगाळ वातावरणाने पारा घसरला- मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंशावर गेले होते. मात्र आता ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले असून ३० अंशावर आले आहे. सध्या सकाळी व रात्री थंडी जाणवत असून दुपारी मात्र उकाडा वाढत आहे. वातावरणातील हा बदल लहान व वृद्धांसाठी नव्हे तर तरूणाईसाठी सर्दी, खोकला व तापाने ग्रासत आहे. 

टॅग्स :weatherहवामान