शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर : जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राला सुरूवात होवून १६ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार मृगाच्या सरी बरसल्या नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मृगाचा थोडा फार पाऊस झाल्यानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात आले आहे. येत्या तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे. त्यामुळे शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मृगाचा पाऊस होताच पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. सुरूवातील जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुध्दा धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकºयांनी आधीच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असल्याने धानाच्या पºह्यांवरील ताण वाढला आहे. पावसाअभावी पऱ्हे वाळत चालले आहे. येत्या चार पाच दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांचे लक्ष चातकासारखे आकाशाकडे लागले आहे.पºहे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी सुरूवातीलाच पऱ्हे टाकले.तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाचा अंदाज बांधत धानाचे पऱ्हे टाकले. मात्र आता पाऊस गायब झाला असल्याने आणि उन्ह तापत असल्याने त्याचा पºह्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.पाऊस सरासरी गाठणार काहवामान विभागाने यंदा जिल्ह्यात सरासरी १३५० मीमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यंदा सुरूवातीलाच पावसाने पाठ फिरविली असल्याने आत्तापर्यंत केवळ १२५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पेरणी आणि पºह्यांच्या दृष्टीने सध्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाने सोमवारपासून दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नाही.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी