शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर : जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राला सुरूवात होवून १६ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार मृगाच्या सरी बरसल्या नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मृगाचा थोडा फार पाऊस झाल्यानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात आले आहे. येत्या तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे. त्यामुळे शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मृगाचा पाऊस होताच पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. सुरूवातील जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुध्दा धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकºयांनी आधीच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असल्याने धानाच्या पºह्यांवरील ताण वाढला आहे. पावसाअभावी पऱ्हे वाळत चालले आहे. येत्या चार पाच दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांचे लक्ष चातकासारखे आकाशाकडे लागले आहे.पºहे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी सुरूवातीलाच पऱ्हे टाकले.तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाचा अंदाज बांधत धानाचे पऱ्हे टाकले. मात्र आता पाऊस गायब झाला असल्याने आणि उन्ह तापत असल्याने त्याचा पºह्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.पाऊस सरासरी गाठणार काहवामान विभागाने यंदा जिल्ह्यात सरासरी १३५० मीमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यंदा सुरूवातीलाच पावसाने पाठ फिरविली असल्याने आत्तापर्यंत केवळ १२५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पेरणी आणि पºह्यांच्या दृष्टीने सध्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाने सोमवारपासून दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नाही.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी