शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

तलावातील हजारो मासे मृत; मत्स्य व्यवसायाचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 09:55 IST

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे.

आमगाव :- नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मृत पडल्याचे आज सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भवरिया व संस्थेचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मृत पडल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी  तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव ( रिसामा) या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजारण करतात. अनेक अडचणी वर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात.

शुक्रवारी सकाळी आजूबाजूला असणाऱ्यांनी काही मासोळी मरण पावलेल्या असल्याचे सांगितले. परंतू रात्रभरात संपुर्ण तलावातील हजारो मासे मृत पावल्याचे त्यांना आज पहाटे माहित झाले. सकाळी ५ वाजल्यापासून मृत मासे काढण्याचे काम केले असता अंदाजे 10 ते 15 क्विंटल मासे मृत पावल्याचे दिसून आले त्यामुळे संस्थेचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषित झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावलेल्या मुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे.परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी व संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी अजुन पर्यन्त भेट दिलेली नाही. घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भवरिया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागा कडे मागणी केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार