जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा पाठिंबागोंदिया : शासकीय व खासगी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी ‘सर्व कर्मचाऱ्यांचा एकच नारा, जुनी पेन्शन लागू करा’ असा नारा देत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी एन.के.लोणकर यांना देण्यात आले. १० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पेन्शनसाठी संघटित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे पेंशन त्यांनी अखंड व प्रामाणिकपणे जगण्यासाठी मिळणारा हक्क आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम १९८२ व सर्वसााधारण भविष्य निर्वाह निधी योजना कर्मचाऱ्यांच्या जीवनातून हद्दपार केली आहे. शासनाच्या अंशदायी पेंशन योजनेला विरोध करून जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या नेतृत्वात इंदिरा गांधी स्टेडियम येथून पायी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले. या मोर्चाचे नेतृत्व वितेश खांडेकर, गोविंद उगले, लिकेश हिरापुरे, संदीप सोमवंशी, जे. व्ही. बुध्देवार, चंदू दुर्गे, शालीक कठाणे, दत्तात्रेय बागडे, राजेंद्र कडव, राहुल कळंबे, नितू डहाट, मुकेश रहांगडाले, भूषण लोहारे, एस.एस. सोनवाने, महेंद्र चव्हाण, मानव जाधव, सचिन धापेकर, ये.डी. म्हशाखेत्री, एम.आर. मेश्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांची धडक
By admin | Updated: December 6, 2015 02:02 IST