शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

अर्जुनी/मोरगाव क्षेत्रात बहुरंगी लढतीने चुरस वाढली

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज तरी राजकीय चित्र धुसरच दिसत आहे. मतदारही मौन पाळून उमेदवारांच्या प्रचाराचा आनंद लुटताना दिसत आहे.

अमरचंद ठवरे - बोंडगावदेवीअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज तरी राजकीय चित्र धुसरच दिसत आहे. मतदारही मौन पाळून उमेदवारांच्या प्रचाराचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी पहिल्या प्रथमच सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्यात बहुरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झालेले दिसत आहे. रिंगणातील अपक्ष उमेदवारांनी प्रचारात कमालीची आघाडी घेतल्याने कधीकाळी कोणाचे परंपरागत असलेली मते विभागले जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी तसेच गोरेगाव तालुक्यात विखुरलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपाचे राजकुमार बडोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेश नंदागवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे, बसपाचे डॉ. भीमराव मेश्राम, शिवसेनेचे किरण कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे धनपाल रामटेके यांच्यासह अपक्ष म्हणून अजय लांजेवार, प्रमोद गजभिये, रत्नदीप दहिवले, दिलवर रामटेके, दिलीपकुमार वालदे यांनीसुध्दा प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ असल्याने राजकीय पक्षाचे स्थानिक नेते मात्र प्रचारापासून अलिप्त राहण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे. सदर मतदार संघात दलितांचे ५० हजारांच्यावर मतदार आहेत. परंतु दलित समाज कोण्या एका नेत्याच्या पाठीमागे नाही, अशी विदारक स्थिती आहे. बसपाचे काही कॅडर मतदार आहेत. मागील निवडणुकीत बसपाचे करमचंद शहारे यांना सहा हजाराच्यावर मते मिळाली होती. यावेळी बसपाचा उमेदवार आर्थिक संपन्नतेचा असल्याने दलित मतदारांना काही प्रमाणात आपल्याकडे ओढण्याचा निश्चितच प्रयत्न करणार, अशी चर्चा मतदार रंगवू लागले आहेत. उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस वर्तुळात रुसवे-फुगवे झाले. त्याचे पर्यवसान बंडखोरीत झाले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश नंदागवळी यांना पक्षातील दोन बंडखोर उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. त्या दोन उमेदवारांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या व्होट बँकेला तीळमात्र छेद दिल्या जाणार नाही, अशी परिस्थती काँग्रेस वर्तुळात निर्माण झालेली दिसत आहे. त्यांच्या हायटेक प्रचाराने दलितांच्या मतावरच त्यांची मदार असल्याचे दिसते. भाजपाचे विद्यमान आ. राजकुमार बडोले यांना पक्षांतर्गत विरोध सहन करावा लागत आहे. भाजपाचे तालुक्यातील नेते शरीराने त्यांच्या सोबत असले तरी मात्र कलाकारी वेगळी करण्याची रणनीती त्यांच्या माशी बसण्यची भीती भाजपचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. भाजपातून बंडखोरी करून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आरूढ झालेल्या किरण कांबळे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा त्यांच्या पाठीमागे आहे. भाजपातील असंतुष्ट पदाधिकारी, कार्यकर्ते धनुष्यबाणाची कमान सांभाळताना दिसत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादीचे उमेदवार रणांगणात आहेत. त्यांंना खा. प्रफुल्ल पटेल यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या प्रचारासाठी पटेलांनी कार्यकर्त्यांना ताकीद दिली. कृषी अधिकारी असल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांशी त्यांचे जवळीक संबध आले. विविध पक्षातील शेतकरी आज तरी त्यांच्या बाजुने दिसत आहेत. भारिप बहुजन महासंघाचासुध्दा मतदार संघात प्रभाव आहे. बाळासाहेबांचे चाहते असल्याने धनपाल रामटेके यांना बळ प्राप्त झाले आहे. दिलीपकुमार वालदे अपक्ष असले तरी पोटजातीनुसार त्यांच्या वाटेला दलितांची मते जाणार, यात शंका नाही. सहा राजकीय पक्षांसह सात अपक्ष उमेदवारांमध्ये मत विभागणी होणार आहे. दलितांची एकगठ्ठा मते कोणाच्या एका दावणीला बांधले जाणार नाहीत. भाजपा-काँग्रेस यांच्या मतविभागणीचा फायदा कोणाच्या माथी पडतो, हे येणारा काळच सांगेल. एकंदरीत बहुरंगी लढतीने भविष्यवेत्यांची गरज पडणार नाही. मतदारच ईव्हीएम मशीनव्दारे आपला हुकूमी एक्का चालवून आश्चर्य करणारा निकाल देतील, असे दिसते.