शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

विठू माऊलीच्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आलेले नाही. येथून यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमीच असते. मात्र तरीही आगारातून वारकऱ्यांसाठी गाडीचे नियोजन केले जात होते.

येत्या २० तारखेला देवशयनी आषाढी एकादशी येत असून या एकादशीला पंढरपुरात विठू माऊलीची यात्रा भरते. यात्रेत विठू माऊलीचे भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. या यात्रेत वारकरी आपली पायी वारी नेत असतानाच जिल्ह्यातून जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी आगाराकडून बसचे नियोजन केले जात होते. त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसची मदत व्हावी व येथील भाविकांना जाण्याची सोय व्हावी या उद्देशातून येथून गाड्या पाठविल्या जात होत्या. मात्र मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, त्यामुळे आषाढीची यात्राच रद्द करण्यात येत आहे. यंदा आषाढीची यात्रा दुसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. यामुळे यंदा येथील भाविकही जाण्याची शक्यता कमी असून वरूनही तसे आदेश आले नसल्याने आगाराने पंढरीच्या यात्रेसाठी विशेष बसेसचे नियोजन केलेले नाही. आषाढीची ही यात्रा वर्षातील सर्वांत मोठी यात्रा असते. या यात्रेच्या निमित्ताने विठू माऊली वारकरी वर्षातून एकदा आपली हजेरी त्यांच्या चरणी लावून येतात. मात्र कोरोनामुळे सतत दुसऱ्यांदा विठू माऊलीच्या वारकऱ्यांना त्यांच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.

---------------------------

२०१९ पर्यंत होते नियोजन

सन २०१९ पर्यंत आगाराकडून पंढरपूरच्या यात्रेकरिता २-४ गाड्यांचे नियोजन केले जात होते. बसस्थानकात पंढरपूरसाठी गाडी कधी सुटणार याबाबतची नोटीस लावली जात होती. मात्र सन २०२० पासून कोरोना शिरला व तेव्हापासून पंढरपूरची यात्राच रद्द झाली. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यंदाही यात्रा रद्द झाल्याने आगारानेे बसेसचे नियोजन केलेले नाही.

----------------------------------

त्या भागातील आगारांची तसेच येणाऱ्या भाविकांची सोय

आगारातून २-४ बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या जात होत्या. जेणेकरून येथील भाविक पंढरपूर यात्रेत सहभागी व्हावे व त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसेसची सोय होती. शिवाय यात्रेतून बसेस परत येत असतानाच या भागातील भाविकांची परत येण्याची समस्या सुटत होती. मात्र कोरोनाने पंढरीच्या या यात्रेलाच ग्रहण लावले आहे.