शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
5
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
6
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
7
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
8
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
9
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
10
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
11
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
12
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
13
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
14
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
15
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
16
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
17
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
18
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
19
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
20
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

विठू माऊलीच्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आलेले नाही. येथून यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमीच असते. मात्र तरीही आगारातून वारकऱ्यांसाठी गाडीचे नियोजन केले जात होते.

येत्या २० तारखेला देवशयनी आषाढी एकादशी येत असून या एकादशीला पंढरपुरात विठू माऊलीची यात्रा भरते. यात्रेत विठू माऊलीचे भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. या यात्रेत वारकरी आपली पायी वारी नेत असतानाच जिल्ह्यातून जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी आगाराकडून बसचे नियोजन केले जात होते. त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसची मदत व्हावी व येथील भाविकांना जाण्याची सोय व्हावी या उद्देशातून येथून गाड्या पाठविल्या जात होत्या. मात्र मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, त्यामुळे आषाढीची यात्राच रद्द करण्यात येत आहे. यंदा आषाढीची यात्रा दुसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. यामुळे यंदा येथील भाविकही जाण्याची शक्यता कमी असून वरूनही तसे आदेश आले नसल्याने आगाराने पंढरीच्या यात्रेसाठी विशेष बसेसचे नियोजन केलेले नाही. आषाढीची ही यात्रा वर्षातील सर्वांत मोठी यात्रा असते. या यात्रेच्या निमित्ताने विठू माऊली वारकरी वर्षातून एकदा आपली हजेरी त्यांच्या चरणी लावून येतात. मात्र कोरोनामुळे सतत दुसऱ्यांदा विठू माऊलीच्या वारकऱ्यांना त्यांच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.

---------------------------

२०१९ पर्यंत होते नियोजन

सन २०१९ पर्यंत आगाराकडून पंढरपूरच्या यात्रेकरिता २-४ गाड्यांचे नियोजन केले जात होते. बसस्थानकात पंढरपूरसाठी गाडी कधी सुटणार याबाबतची नोटीस लावली जात होती. मात्र सन २०२० पासून कोरोना शिरला व तेव्हापासून पंढरपूरची यात्राच रद्द झाली. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यंदाही यात्रा रद्द झाल्याने आगारानेे बसेसचे नियोजन केलेले नाही.

----------------------------------

त्या भागातील आगारांची तसेच येणाऱ्या भाविकांची सोय

आगारातून २-४ बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या जात होत्या. जेणेकरून येथील भाविक पंढरपूर यात्रेत सहभागी व्हावे व त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसेसची सोय होती. शिवाय यात्रेतून बसेस परत येत असतानाच या भागातील भाविकांची परत येण्याची समस्या सुटत होती. मात्र कोरोनाने पंढरीच्या या यात्रेलाच ग्रहण लावले आहे.