शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विठू माऊलीच्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सतत दुसऱ्यांदा पंढरीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याने येथून विठू माऊलीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी यंदाही विशेष बस सेवेचे नियोजन करण्यात आलेले नाही. येथून यात्रेत सहभागी होणाऱ्यांची संख्या कमीच असते. मात्र तरीही आगारातून वारकऱ्यांसाठी गाडीचे नियोजन केले जात होते.

येत्या २० तारखेला देवशयनी आषाढी एकादशी येत असून या एकादशीला पंढरपुरात विठू माऊलीची यात्रा भरते. यात्रेत विठू माऊलीचे भाविक लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. या यात्रेत वारकरी आपली पायी वारी नेत असतानाच जिल्ह्यातून जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी आगाराकडून बसचे नियोजन केले जात होते. त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसची मदत व्हावी व येथील भाविकांना जाण्याची सोय व्हावी या उद्देशातून येथून गाड्या पाठविल्या जात होत्या. मात्र मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, त्यामुळे आषाढीची यात्राच रद्द करण्यात येत आहे. यंदा आषाढीची यात्रा दुसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. यामुळे यंदा येथील भाविकही जाण्याची शक्यता कमी असून वरूनही तसे आदेश आले नसल्याने आगाराने पंढरीच्या यात्रेसाठी विशेष बसेसचे नियोजन केलेले नाही. आषाढीची ही यात्रा वर्षातील सर्वांत मोठी यात्रा असते. या यात्रेच्या निमित्ताने विठू माऊली वारकरी वर्षातून एकदा आपली हजेरी त्यांच्या चरणी लावून येतात. मात्र कोरोनामुळे सतत दुसऱ्यांदा विठू माऊलीच्या वारकऱ्यांना त्यांच्या दर्शनाला मुकावे लागणार आहे.

---------------------------

२०१९ पर्यंत होते नियोजन

सन २०१९ पर्यंत आगाराकडून पंढरपूरच्या यात्रेकरिता २-४ गाड्यांचे नियोजन केले जात होते. बसस्थानकात पंढरपूरसाठी गाडी कधी सुटणार याबाबतची नोटीस लावली जात होती. मात्र सन २०२० पासून कोरोना शिरला व तेव्हापासून पंढरपूरची यात्राच रद्द झाली. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यंदाही यात्रा रद्द झाल्याने आगारानेे बसेसचे नियोजन केलेले नाही.

----------------------------------

त्या भागातील आगारांची तसेच येणाऱ्या भाविकांची सोय

आगारातून २-४ बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या जात होत्या. जेणेकरून येथील भाविक पंढरपूर यात्रेत सहभागी व्हावे व त्या भागातील आगारांना चालक-वाहक व बसेसची सोय होती. शिवाय यात्रेतून बसेस परत येत असतानाच या भागातील भाविकांची परत येण्याची समस्या सुटत होती. मात्र कोरोनाने पंढरीच्या या यात्रेलाच ग्रहण लावले आहे.