शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:27 IST

मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने आपल्या जीवनात प्लास्टिकचा एवढा वापर केला आहे की, मानवी जीवनावर प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्लास्टिक रस्त्यावर टाकल्यामुळे ते गाई-म्हशी सेवन करतात व त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा मानव वापर करतात व त्यामुळे मानवाच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करावयास पाहिजे. सध्याच्या युगामध्ये वातानुकुलित यंत्राचा वापर फार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. परंतू एसीमुळे निघालेल्या वायुचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत कायदेविषयक साक्षरता शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वन अधिकारी बडगे, सह दिवाणी न्यायाधीश पी.बी.भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, वनसंरक्षक मेश्राम, पीएलव्ही आशा ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कटरे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना १९७२ पासून अस्तित्वात आली. पर्यावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाकरीता आपण स्वत:च्या घरापासून सुरुवात करावी असे सांगितले. वन अधिकारी बडगे यांनी, पर्यावरण म्हणजे मानवासोबत सजीवसृष्टी, आजुबाजूचे वातावरण, एकमेकांशी होणारी क्रि या होय. बाहेरचे तापमान वाढते तेव्हा माणूस बेचैन होते. प्रदूषणाविषयी कायदे इंदिरा गांधी यांनी आमलात आणले असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, सह दिवाणी न्यायाधीश भोसले व अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास वनसंरक्षक मेश्राम, जिल्हा न्यायालय वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात उपवनसंरक्षक युवराज यांनी स्वच्छ हवा व पाणी मिळण्याकरीता वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. आभार सहायक उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी मानले.