शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:27 IST

मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने आपल्या जीवनात प्लास्टिकचा एवढा वापर केला आहे की, मानवी जीवनावर प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्लास्टिक रस्त्यावर टाकल्यामुळे ते गाई-म्हशी सेवन करतात व त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा मानव वापर करतात व त्यामुळे मानवाच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करावयास पाहिजे. सध्याच्या युगामध्ये वातानुकुलित यंत्राचा वापर फार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. परंतू एसीमुळे निघालेल्या वायुचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत कायदेविषयक साक्षरता शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वन अधिकारी बडगे, सह दिवाणी न्यायाधीश पी.बी.भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, वनसंरक्षक मेश्राम, पीएलव्ही आशा ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कटरे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना १९७२ पासून अस्तित्वात आली. पर्यावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाकरीता आपण स्वत:च्या घरापासून सुरुवात करावी असे सांगितले. वन अधिकारी बडगे यांनी, पर्यावरण म्हणजे मानवासोबत सजीवसृष्टी, आजुबाजूचे वातावरण, एकमेकांशी होणारी क्रि या होय. बाहेरचे तापमान वाढते तेव्हा माणूस बेचैन होते. प्रदूषणाविषयी कायदे इंदिरा गांधी यांनी आमलात आणले असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, सह दिवाणी न्यायाधीश भोसले व अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास वनसंरक्षक मेश्राम, जिल्हा न्यायालय वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात उपवनसंरक्षक युवराज यांनी स्वच्छ हवा व पाणी मिळण्याकरीता वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. आभार सहायक उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी मानले.