शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे होतेय कम बॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.

ठळक मुद्देबळीराजाची चिंता दूर : रोवणीला येणार थोडा वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिन्यात पाठ फिरविलेल्या पावसाने जुलै महिन्यात सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला सुध्दा काही प्रमाणात वेग आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरिपातील पिकांना सुध्दा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पण यंदा सुरूवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कसा होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. तर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ टक्के रोवणी आटोपली होती. त्यामुळे उर्वरित रोवणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने रोवणीच्या कामासाठी याची मदत होत आहे. गुरूवारी (दि.९) सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातवरण होते. सालेकसा तालुक्यात सुध्दा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या भागात काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने सुध्दा पुढील दोन दिवस दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे कमबॅक होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती