शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जिल्ह्यात पावसाचे होतेय कम बॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.

ठळक मुद्देबळीराजाची चिंता दूर : रोवणीला येणार थोडा वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिन्यात पाठ फिरविलेल्या पावसाने जुलै महिन्यात सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला सुध्दा काही प्रमाणात वेग आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरिपातील पिकांना सुध्दा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पण यंदा सुरूवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कसा होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. तर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ टक्के रोवणी आटोपली होती. त्यामुळे उर्वरित रोवणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने रोवणीच्या कामासाठी याची मदत होत आहे. गुरूवारी (दि.९) सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातवरण होते. सालेकसा तालुक्यात सुध्दा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या भागात काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने सुध्दा पुढील दोन दिवस दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे कमबॅक होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती