शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

घनदाट जंगल होताहेत उजाड माळरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:16 IST

जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड वाढून घनदाट जंगल असलेली जागा आता उजाड माळरान झाली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची गरज : वनसंपदा असुरक्षित, वन्यप्रेमींची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड वाढून घनदाट जंगल असलेली जागा आता उजाड माळरान झाली आहे.पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलाची तोड करण्यात आली. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी सुरूवात झाली. प्रत्येक देशात किमान ३३ टक्के जंगल आरक्षित ठेवावे, असा आंतरराष्ट्रीय कायदा करण्यात आला असून त्यानुसार केंद्र शासनानेही प्रत्येक राज्याला किमान ३0 टक्के जंगल ठेवण्याचे सक्तीचे केले आहे.राज्याच्या आरक्षित जंगलाचा भार विदर्भावर आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ६० टक्के भूभागावर जंगल आहे. या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी शेकडो अधिकारी व हजारो वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वनकर्मचाºयांचे जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करणे, हे मुख्य काम असतानाही त्यांना या व्यतिरिक्त इतर कामांनाही जुंपले जात आहे. त्यामुळे वनकर्मचाºयांचे जंगल संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा वनतस्करांनी घेण्यासाठी सुरूवात केली आहे.वन कर्मचाºयांकडे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे तयार करणे, टीसीएमची कामे, दुधाळ जनावरे, बैलगाडींचे वाटप, गॅस वितरण, निर्धूर चूल, लाख उत्पादन आदींच्या कामाचे नियोजन व देखरेख त्यांच्याकडे सोपविली आहे. वनकर्मचारी या कामामध्ये गुंतलेले राहत असल्यामुळे मुख्य कामाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने वन कर्मचाºयांवरील कामाचा अतिरिक्त बोजा कमी करून त्यांच्याकडे जंगल संरक्षणाचीच जबाबदारी द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.वनविभागाकडून प्रयत्नांची गरजजंगलाची काळजी घेणाऱ्या नागरिकांच्या मनात जंगलाविषयी प्रेम निर्माण व्हावे व जंगल संरक्षणात सहकार्य लाभावे, यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी मुख्य उद्देशापासून वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. बाजूला घनदाट जंगल आणि आतमध्ये मात्र उजाड माळरान आहे.वनहक्काच्या पट्ट्याचा गैरफायदाशासनाने वनहक्क कायदा करून पूर्वीपासून जंगलात अतिक्रमण करून ठेवलेल्या नागरिकांना वन हक्क पट्टयांचे वाटप करणे सुरू केले. या अंतर्गत जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्काच्या पट्टयांचे वाटप करण्यात आले आहे. या वनहक्क पट्टयांचा गैरफायदा काही नागरिकांनी घेणे सुरू केले. वनपट्टा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्यावर अतिक्रमण असल्याचे दाखविले जात आहे. अशा प्रकारामुळे जिल्ह्यातील शेकडो एकर जंगलाची अवैध तोड झाली आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.जंगलाची घनता कमीरस्त्याजवळची झाडे तोडताना वनतस्कर सहज सापडू शकतो. त्यामुळे वनतस्कर रस्त्याजवळून अर्धा किमी अंतरावरची झाडे तोडत नाही. आतमध्ये जाण्याची हिंमत सहजासहजी वनकर्मचारी करीत नसल्यामुळे वनतस्कर जंगलातील झाडे तोडतात. त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यापासून दूर असलेल्या भागातील जंगलाची घनता कमी होत चालली आहे. वनाधिकारीसुद्धा खुंट मोजण्यासाठी आतमध्ये जात नाही. ही बाब वनकर्मचाºयांना माहित असल्यामुळे या भागातील जंगलाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.