शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

घनदाट जंगल होताहेत उजाड माळरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:16 IST

जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड वाढून घनदाट जंगल असलेली जागा आता उजाड माळरान झाली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची गरज : वनसंपदा असुरक्षित, वन्यप्रेमींची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड वाढून घनदाट जंगल असलेली जागा आता उजाड माळरान झाली आहे.पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलाची तोड करण्यात आली. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी सुरूवात झाली. प्रत्येक देशात किमान ३३ टक्के जंगल आरक्षित ठेवावे, असा आंतरराष्ट्रीय कायदा करण्यात आला असून त्यानुसार केंद्र शासनानेही प्रत्येक राज्याला किमान ३0 टक्के जंगल ठेवण्याचे सक्तीचे केले आहे.राज्याच्या आरक्षित जंगलाचा भार विदर्भावर आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण भूभागाच्या ६० टक्के भूभागावर जंगल आहे. या जंगलाचे संरक्षण करण्यासाठी शेकडो अधिकारी व हजारो वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वनकर्मचाºयांचे जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करणे, हे मुख्य काम असतानाही त्यांना या व्यतिरिक्त इतर कामांनाही जुंपले जात आहे. त्यामुळे वनकर्मचाºयांचे जंगल संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फायदा वनतस्करांनी घेण्यासाठी सुरूवात केली आहे.वन कर्मचाºयांकडे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे तयार करणे, टीसीएमची कामे, दुधाळ जनावरे, बैलगाडींचे वाटप, गॅस वितरण, निर्धूर चूल, लाख उत्पादन आदींच्या कामाचे नियोजन व देखरेख त्यांच्याकडे सोपविली आहे. वनकर्मचारी या कामामध्ये गुंतलेले राहत असल्यामुळे मुख्य कामाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने वन कर्मचाºयांवरील कामाचा अतिरिक्त बोजा कमी करून त्यांच्याकडे जंगल संरक्षणाचीच जबाबदारी द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.वनविभागाकडून प्रयत्नांची गरजजंगलाची काळजी घेणाऱ्या नागरिकांच्या मनात जंगलाविषयी प्रेम निर्माण व्हावे व जंगल संरक्षणात सहकार्य लाभावे, यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी मुख्य उद्देशापासून वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. बाजूला घनदाट जंगल आणि आतमध्ये मात्र उजाड माळरान आहे.वनहक्काच्या पट्ट्याचा गैरफायदाशासनाने वनहक्क कायदा करून पूर्वीपासून जंगलात अतिक्रमण करून ठेवलेल्या नागरिकांना वन हक्क पट्टयांचे वाटप करणे सुरू केले. या अंतर्गत जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्काच्या पट्टयांचे वाटप करण्यात आले आहे. या वनहक्क पट्टयांचा गैरफायदा काही नागरिकांनी घेणे सुरू केले. वनपट्टा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्यावर अतिक्रमण असल्याचे दाखविले जात आहे. अशा प्रकारामुळे जिल्ह्यातील शेकडो एकर जंगलाची अवैध तोड झाली आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.जंगलाची घनता कमीरस्त्याजवळची झाडे तोडताना वनतस्कर सहज सापडू शकतो. त्यामुळे वनतस्कर रस्त्याजवळून अर्धा किमी अंतरावरची झाडे तोडत नाही. आतमध्ये जाण्याची हिंमत सहजासहजी वनकर्मचारी करीत नसल्यामुळे वनतस्कर जंगलातील झाडे तोडतात. त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यापासून दूर असलेल्या भागातील जंगलाची घनता कमी होत चालली आहे. वनाधिकारीसुद्धा खुंट मोजण्यासाठी आतमध्ये जात नाही. ही बाब वनकर्मचाºयांना माहित असल्यामुळे या भागातील जंगलाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.