शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:00 IST

शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन रस्त्याशेजारी डबक्यात उलटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेने त्या मार्गावर बंदोबस्त लावून पाचपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत हा क्रम चालला. मात्र, मागील काही दिवसांपासून परत विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई फक्त ‘चार दिन की चांदनी’च ठरल्याचे बोलले जात आहे. शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते. यावर पोलिस विभागाने लगेच कडक पाऊल उचलले व वाहतूक नियंत्रण शाखेकडून बायपास रोडवरील राजा भोज चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. हे पोलिस पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. परिणामी विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक बंद होती. मात्र, दोन-अडीच महिन्यांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे. कारण ­दिवाळीनंतर आता शाळा सुरू झाल्या असून, वाहनांत विद्यार्थी परत एकदा कोंबून नेले जात असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेला २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा विसर पडला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी परत एकदा आपली मनमर्जी सुरू केल्याची दिसते. यात मात्र विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. 

कित्येकदा घडले असले अपघात - २० ऑगस्ट रोजी स्कूल व्हॅनचा घडलेला अपघात हा काही पहिलाच अपघात नव्हता. यापूर्वी आणखीही अपघात घडले आहेत. अशात एकतर वाहनचालकांनी खबरदारीने वाहन चालविणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांच्याकडून नियम मोडला जात असल्यास पोलिस विभागाने नजर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने अपघात घडत आहेत.

थोड्या अंतरावर उतरविले जात होते विद्यार्थ्यांना राजा भोज चौकात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन चालक त्यांना चौकापासून थोड्या अंतरावर गाडीतून उतरवित होते. त्यानंतर त्यातील ५-५ विद्यार्थ्यांना बसवून शाळेत सोडत होते. तर काही विद्यार्थी पायी-पायीच शाळेत जात असल्याचेही दिसत होते. आतापर्यंत हाच प्रकार सुरू होता. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या असून, आता पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून त्यांची ने-आण सुरू आहे. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण