शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासी विकास महामंडळाच्या उघड्यावरील धानाला फुटले कोंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:32 IST

संस्थाचालक संकटात : दरवर्षी नुकसान तरी शासन धडा घेईना; सहा महिन्यांपासून धान जागेवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन आणि राइस मिलर्स यांच्यातील तिढा गेल्या सहा महिन्यांपासून कायम आहे. यावर तोडगा न निघाल्याने आदिवासी विकास महामंडळाने खरीप हंगामात खरेदी केलेला १५ लाख क्विंटल धान तसाच केंद्रावर उघड्यावर पडला आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने या धानाला कोंब फुटले असून, तो मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण, गेल्या सहा महिन्यांपासून राइस मिलर्सच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील राइस मिलर्सनी भरडाईसाठी धानाची उचल केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान पडून आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने अनेक केंद्रांवरील धानाला कोंब फुटत असून, धान खराब होत आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेतकऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने धानाला कोंब फुटले असून, तो सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी नुकसान, पण महामंडळ दखल घेईनाआदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. तर आता अवकाळी पावसामुळे हे धान भिजत असल्याने दरवर्षी हजारो क्विंटल धान फेकण्यात जातो. हा दरवर्षीचाच प्रकार आहे. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होऊनदेखील शासन तसेच महामंडळ दखल घेत नाही.

६ हजार क्विंटल धानाला फुटले अंकुरसडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेत- कऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने जवळपास ६ हजार क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे.

चूक शासनाची, खापर संस्थांवरआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान साठवून ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी खरेदी केलेला धान हा ताडपत्र्यांनी झाकून उघड्यावर पडला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान झाले असून, संबंधित विभाग याचे खापर धान खरेदी करणाऱ्या संस्थांवर फोडत असल्याने या संस्थादेखील संकटात आल्या आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया