शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आदिवासी विकास महामंडळाच्या उघड्यावरील धानाला फुटले कोंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:32 IST

संस्थाचालक संकटात : दरवर्षी नुकसान तरी शासन धडा घेईना; सहा महिन्यांपासून धान जागेवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन आणि राइस मिलर्स यांच्यातील तिढा गेल्या सहा महिन्यांपासून कायम आहे. यावर तोडगा न निघाल्याने आदिवासी विकास महामंडळाने खरीप हंगामात खरेदी केलेला १५ लाख क्विंटल धान तसाच केंद्रावर उघड्यावर पडला आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने या धानाला कोंब फुटले असून, तो मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. पण, गेल्या सहा महिन्यांपासून राइस मिलर्सच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील राइस मिलर्सनी भरडाईसाठी धानाची उचल केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान पडून आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने अनेक केंद्रांवरील धानाला कोंब फुटत असून, धान खराब होत आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेतकऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने धानाला कोंब फुटले असून, तो सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरवर्षी नुकसान, पण महामंडळ दखल घेईनाआदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताडपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. तर आता अवकाळी पावसामुळे हे धान भिजत असल्याने दरवर्षी हजारो क्विंटल धान फेकण्यात जातो. हा दरवर्षीचाच प्रकार आहे. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होऊनदेखील शासन तसेच महामंडळ दखल घेत नाही.

६ हजार क्विंटल धानाला फुटले अंकुरसडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावांतील शेत- कऱ्यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी केली. मात्र, राइस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजल्याने जवळपास ६ हजार क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे.

चूक शासनाची, खापर संस्थांवरआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान साठवून ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था केली नाही. परिणामी खरेदी केलेला धान हा ताडपत्र्यांनी झाकून उघड्यावर पडला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे या धानाचे नुकसान झाले असून, संबंधित विभाग याचे खापर धान खरेदी करणाऱ्या संस्थांवर फोडत असल्याने या संस्थादेखील संकटात आल्या आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया