शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला; अंगावर वाहताहेत घामाच्या धारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:48 IST

Nagpur : पारा गेला थेट ३४.५ अंशांवर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पावसाळा संपला असून, मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरीही लावलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा उन्ह तापू लागले आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढता राहणार असे महिन्याच्या पहिल्याच दिवशी जाणवले. मध्यंतरी २८ अंशांवर गेलेले तापमान मंगळवारी (दि.२) थेट ३४.५ अंशांवर पोहोचले. यामुळे मात्र नागरिकांचा जीव कासाविस झाला असून, अंगावर घामाच्या धारा वाहताना दिसत आहे.

यंदा वरुणराजा जिल्ह्यावर चांगलेच मेहरबान दिसून आले व यामुळेच जिल्ह्यात तब्बल १११ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जून महिन्यात डोळे दाखविल्यानंतर जुलै महिन्यापासून पावसाने चांगलीच साथ दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ९ व १० तारखेलाही पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. दुसऱ्यांचा पूरस्थिती निर्माण केली होती. पावसाच्या हजेरीमुळे नदी-नाले व तलाव तुडुंब झाले असून, पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.

असे असताना हवामानातील उकाडा काही केल्या कमी झालेला नाही. पाऊस बरसत होता तोपर्यंत हवामानात गारवा निर्माण होऊन दिलासा मिळत होता. मात्र, पाऊस थांबताच उकाडा वाढून अंगाची लाहीलाही होऊ लागली होती. एवढा पाऊस बरसल्यानंतरही हवामानात गारवा निर्माण होत नसल्याने निसर्गाचे चक्र समजण्यापलीकडे झाले आहे. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपला असून, मागील काही दिवसांपासून पावसानेही हजेरी लावलेली नाही. मंगळवारी (दि.१) जिल्ह्याचे तापमान ३४.५ अंशांवर पोहोचले होते. यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. 

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम सततच्या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. उन्हाची तीव्रता एवढी वाढली आहे की, मार्च-एप्रिल महिन्याची अनुभूती येत आहेत. घराबाहेर पडतानाही विचार करावा लागत आहे.

परत दिला यलो अलर्ट पावसाळा आता संपला असून पावसाने काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. अशातच हवामान खात्याने ५ व ६ तारखेला यलो अलर्ट दिला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया