शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जिल्ह्यात आजपासून राबविली जाणार जिवंत सातबारा मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:22 IST

मृत खातेदारांच्या वारसांची होणार नोंद : महसूल गावात चावडी वाचन

अमरचंद ठवरे लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महसूल विभागांतर्गत १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत तालुक्यात १ एप्रिलपासून सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सातबारा प्राप्त नागरिकांनी मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीसाठी जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी कळविले आहे.

सातबारा अभिलेखामध्ये मृतक खातेदारांचे नाव आजही मोठ्या प्रमाणात आहे. जमिनीच्या सातबारावर मयतांचे नाव असल्याने त्यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांमध्ये वारसांची नोंद ठराविक कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी सभासदांची होणारी अडचण लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. सातबारा वरील मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा अद्ययावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तालुक्यात सर्वच गाव पातळीवर जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळ अधिकारी यांच्या सहकाऱ्यांनी महसूल यंत्रणा सज्ज आहे.

या कालावधीत घेणार नावांची नोंद२१ एप्रिल ते १० मे पर्यंत तलाठ्यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करून मंडळ अधिकारी १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफार वर शिक्कामोर्तब करून सातबारा दुरुस्त करून जिवंत व्यक्तींच्या नावाची नोंद घेणार आहे.

असा राहणार कालबद्ध कार्यक्रमतालुक्यातील सर्व मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदीचे कामकाज गाव स्तरावरून करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. १ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत तलाठी सांजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत वारसांना संबंधी मृत्यू दाखला, वारसांबाबत प्रतिज्ञा लेख, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला तलाठ्याकडे सादर करून चौकशी अंतिम मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ही फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना