शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धानाची जुळवाजुळव करण्यासाठी ‘त्या’ संचालकांची भटकंती सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 21:10 IST

खरेदी करण्यात आलेला धान नेमका गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा धान गायब असून, या धानाची संबंधित केंद्रांनी परस्पर विक्री केली की केवळ कागदावरच धानखरेदी दाखविली, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने या सातही केंद्रांना आठ दिवसांपूर्वीच नोटीस बजावून धान जमा करा अथवा धानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रब्बी हंगामात शासकीय धानखरेदी केंद्राच्या माध्यमातून धानखरेदी करण्यात  आली. यापैकी सात सहकारी संस्थांच्या गोदामांत खरेदी केलेला सुमारे ३० हजार क्विंटल धानच गायब असल्याची बाब पुढे आली. दरम्यान, हा धान गोदामात जमा करण्यासाठी फेडरेशनने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर फौजदारी  कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे संबंधित संस्थेच्या संचालकांनी धानाची जुळवाजुळव करण्यासाठी भटकंती  सुरू केल्याचे चित्र आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या चमूने रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची पाहणी करण्यासाठी गोदामांना भेटी दिल्या. त्यात गोरेगाव तालुक्यातील १, आमगाव १, सालेकसा तालुक्यातील ३ आणि गोंदिया तालुक्यातील २ संस्थांच्या गोदामांमध्ये तब्बल ३० हजार क्विंटल धान नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे खरेदी करण्यात आलेला धान नेमका गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा धान गायब असून, या धानाची संबंधित केंद्रांनी परस्पर विक्री केली की केवळ कागदावरच धानखरेदी दाखविली, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने या सातही केंद्रांना आठ दिवसांपूर्वीच नोटीस बजावून धान जमा करा अथवा धानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. पण, खरीप हंगामातील धानखरेदी अद्यापही सुरू झालेली नाही. तर जुना धानसुद्धा जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे धान आणायचा कुठून, असा प्रश्न या सातही संस्थांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच  त्यांनी मागील चार-पाच दिवसांपासून लगतच्या जिल्ह्यातून आणि मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून धान मिळतोय काय याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ३१ ऑक्टोबरपूर्वी धान जमा न केल्यास फौजदारी कारवाई होईल शिवाय नेहमीसाठीच संस्थेचा धानखरेदीचा परवानासुद्धा रद्द होईल. त्यामुळे पैसे आणि धानाचे नियोजन करण्यात हे संचालक सध्या व्यस्त  असल्याची माहिती आहे. 

राजकीय दबावामुळे झाला कारवाईस विलंब रब्बी हंगामातील धानखरेदीतील घोळ पुढे आल्यानंतर काही केंद्र संचालक हे बड्या राजकीय नेत्यांचे जवळचे होते. त्यामुळे त्यांनी कारवाई विलंब करण्यासाठी फेडरेशनवर दबाव टाकल्याची माहिती आहे. गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यातील केंद्राची सध्या जोरदार चर्चा असून, ही दोन्ही केंद्रे राजकारणाशी संबंधित व्यक्तीची असल्याचे बोलते जाते. 

शेतकरी म्हणतात, कठोर कारवाई करा शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा धान खरेदी करून त्यावरील लोणी खाणाऱ्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या धानखरेदी केंद्राच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कारवाईच्या भीतीने तीन संचालकांची प्रकृती बिघडली- धानखरेदी घोळप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील तीन धानखरेदी संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. १५ ते २० संचालक सध्या जेलची हवा खात आहेत. तर पुन्हा सात संस्थांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. याच चिंतेने तीन  संचालकांची प्रकृती बिघडली असून ते सध्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीMarket Yardमार्केट यार्ड