शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

दहा वर्षात धानाच्या भावात केवळ ८८० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : पूर्व विदर्भात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र, ऊस उत्पादक किंवा पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : पूर्व विदर्भात धान हे प्रमुख पीक आहे. मात्र, ऊस उत्पादक किंवा पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी जसे प्रयत्न झाले. तसे प्रयत्न मात्र दुर्दैवाने या भागात झाले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या तूटपुंज्या हमीभाव वाढीवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल केवळ ७२ रुपयांची भाववाढ केली आहे. त्यामुळेच मागील दहा वर्षात केवळ ८८० रुपयांची भाववाढ झाली आहे.

शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी दर हंगामात शेतमालाचे दर केंद्र सरकार जाहीर करते. मागील दहा वर्षात धानाच्या हमीभावात केवळ ८६० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे खते, कीटकनाशके, बियाणे, इंधनाच्या किमती दुप्पट - तिप्पट वाढल्या. पण, त्या तुलनेने जाहीर केलेले हमीभाव अल्पच असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याच्या काही भागासह कोकणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मागील दहा वर्षांतील धानाच्या किमान हमीभावातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सन २०११ - १२ ते २०२१ - २२ या कालावधीत ८६० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली, तर या कालावधीत धानाच्या उत्पादन खर्चातही दुपटीने वाढ झाली. पण धानाची आधारभूत किंमत दुप्पट होऊ शकली नाही. सन २००१ ते २०१० - ११ या कालावधीत धानाच्या किमतीत दुप्पट वाढ झाल्याचे निदर्शनास येते. सन २००१ या वर्षात धानाला ५१० रुपये प्रतिक्विंटल दर होता, तो २०१० वर्षात १०८० झाला. २०२१ - २२ या हंगामासाठी केंद्र शासनाने धानाच्या हमीभावात ७२ रुपये वाढ केली. पुढील खरीप हंगामात १,९४० रुपये दर शेतकर्‍यांना धानासाठी मिळणार आहे. उत्पादन खर्चानुसार शासनाने दिलेली भाववाढ ही फारच अल्प असून, किमान उत्पादन खर्चाचा विचार करून केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

..............

खत बियाण्याचे दर झाले तिप्पट

खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या दरात मागील दहा वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे धानाच्या लागवड खर्चात भरपूर वाढ झाली आहे. पण त्या तुलनेत धानाला हमीभाव मिळत नसल्याने धानाची शेती ही शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा होत चालली आहे. धानाच्या शेतीसाठी एकरी १५ ते १८ हजार रुपये खर्च केल्यानंतर २० ते २५ हजार रुपयांचे उत्पादन हाती येत आहे. त्यातही शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबलेल्या मजुरीचा समावेश नाही. २०११मध्ये डीएपी खताची पिशवी ४१० रुपयाला मिळत होती. त्यासाठी आता १२०० रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाचा विचार केल्यास २०११मध्ये डिझेलचा प्रतिलीटर दर ३७ रुपये ७५ पैसे होता. तो आता ९४ रुपये २८ पैशांवर पोहोचला आहे. १० वर्षांपूर्वी ट्रॅक्टरभाडे प्रतितास २५० रुपये होते ते आता ९०० रुपये आहे.

...............

हमीभाव जाहीर करण्याला १९६४ पासून झाली सुरुवात

ब्रिटिश शासन काळापासून देशात किमान हमीभाव प्रणाली सुरू आहे. त्या-त्या शासनकर्त्यांनी या प्रणालीत शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत बदल केला असला तरी, किमान आधारभूत किमतीसंदर्भात अजूनही कायदा करण्यास कोणत्याही सरकारला यश आले नाही. २४ डिसेंबर १९६४ रोजी किमान हमीभावला मंजुरी मिळाली. १९ ऑक्टोबर १९६५ रोजी केंद्र शासनाचे सचिव बी. शिवरामन यांनी यावर शिक्कामोर्तब केले. यानंतर सन १९६५ - ६६ हंगामासाठी सर्वप्रथम गव्हाच्या किमान हमीभाव किमतीची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील सरकार प्रत्येक हंगामात त्या-त्या शेतमालाचे हमीभाव जाहीर करते.

.............

कोट

शेतमालाच्या उत्पादन खर्चानुसार शेतमालाचे दर दुप्पट असावेत, अशी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे. मात्र, आधारावर अद्याप शेतमालाला भाव मिळाला नाही. केंद्र सरकारच्या निरीक्षणानुसार धानासाठी प्रतिक्विंटल १२९३ रुपये उत्पादन खर्च निर्धारित करण्यात आला आहे. म्हणजेच याच्या दुप्पट २५८६ रुपये प्रतिक्विंटल दर धान उत्पादकांना मिळायला पाहिजे.

- गंगाधर परशुरामकर, प्रगतशील शेतकरी, खोडशिवनी.