शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

गोंदिया : हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच मान्सूनदेखील महाराष्ट्रात वेळेत दाखल हाेईल असे संकेत ...

गोंदिया : हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच मान्सूनदेखील महाराष्ट्रात वेळेत दाखल हाेईल असे संकेत दिले होते. मात्र, यंदा सुरुवातीपासून अंदाज चुकत आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपात धानाची लागवड केली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे आता रोवणीयोग्य होत असून, त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ ते ३० जूपर्यंत १९२.८ मिमी पाऊस पडतो, तर यंदा या कालावधीत २०८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. यंदा पाऊस सलग होत नसल्याने नदी, नाले, तलाव अजूनही कोरडे पडले असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

..............

दुबार पेरणीचे संकट नाही

मागील आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, रोवणीची कामे खोळंबली आहेत. पाऊस अधृूनमधून जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते पाणी करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही.

.........

पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर

सुरुवातीपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणे साहजिक आहे. मात्र, हवामान विभागाने ८ जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधी चांगला पाऊस झाल्यास रोवणी करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र, पावसाने दगा दिल्यास व पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

...........

कोट :

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकून झाले आहे. आपल्या भागात जुलैनंतरच दमदार पावसाला सुरुवात होते. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

........

देव अशी परीक्षा दरवर्षी घेतो

मागील दोन-तीन वर्षांपासून कधी ओल्या, तर कधी दुष्काळाला तोंड देत आहे. यंदादेखील हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आताच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता सतावत आहे.

- राहुल बिसेन, शेतकरी

...........

वातावरणातील बदलाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेती आता बेभरवशाची झाली आहे.

- मनोज दमाहे, शेतकरी.

................

आतापर्यंत अपेक्षित पाऊस : १९२.८ मिमी

प्रत्यक्ष झालेले पाऊस : २०८.८ मिमी

आतापर्यंत झालेली पेरणी : १६ टक्के

.....................

कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका झालेला पाऊस पडलेला पाऊस