शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

शिक्षक दिनविशेष; गोंदिया जिल्ह्यात शिक्षकाने बंद शाळेला दिली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 10:58 IST

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती.

ठळक मुद्देजिव्हाळ्यातून घडविली शाळाछत्तीसगडी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीत केले बोलके

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती. शुध्द मराठीत बोलणे तर नाहीच पण झाडीबोलीचेही शब्द त्यांच्या तोंडातून येत नव्हते. एकेकाळी स्वातंत्रदिनी झेंडावंदनाला शाळेतील दोनच शिक्षक सोडले तर गावातील विद्यार्थी व पालकही उपस्थित रहात नव्हते. अश्या गावातील विद्यार्थ्यांना मराठीत बोलके करून शाळा सुरू करण्याचे काम येथील शिक्षक मंगलमूर्ती किशन सयाम यांनी केले आहे.गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे नक्षल कारवाईसाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील गावे ही नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखली जातात. देवरी तालुक्याच्या रेहळी या गावात शिक्षक मंगलमूर्ती सयाम ३ आॅगस्ट २०१२ मध्ये रूजू झाले. त्या गावात कुणालाही मराठीचा गंध नव्हता. वाचन करताना किंवा बोलताना विद्यार्थ्यांना अडचण जात होती. शाळेकडे अनेक मुलांची पाठ होती. मंगलमूर्ती यांनी पालकांशी दिवसरात्र संवाद साधणे सुरू केले. पालकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या गावातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची गोडी कशी लागेल याचा अभ्यास करून त्यांनी लोकांशी सतत संवाद साधून आपलेसे केले. लोकांची मने जोडण्यासाठी रात्रकालीन स्रेहसंमेलन, प्रौढ कबड्डी स्पर्धा व अनेक लोकोपयोगी कार्यक्रम शाळेत घेतले. शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण इतरही विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी स्वत:ची दोन्ही मुलांची नावे त्यांनी या शाळेत दाखल करून त्यांच्यापासून प्रवेश वाढवा उपक्रमाला सुरूवात केली. शिक्षक सयाम यांच्या कार्याची चर्चा परिसरात गावात गेली. परिणामी त्यांच्या हातून उत्तम विद्यार्थी घडताहेत हे ऐकून परिसरातील केशोरी, वांढरा, डोंगरगाव व चिचगड या गावातील २९ विद्यार्थी त्यांच्या शाळेत दाखल झाले. ते रूजू झाले तेव्हा ७० पटसंख्या होती आता येथे ११५ विद्यार्थी आहेत. अवघड क्षेत्रात असलेल्या या शाळेचा आदर्श घेण्यासाठी जिल्ह्यातील ४० शाळांनी त्या शाळेला भेट दिली आहे. आजघडीला ही शाळा जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळांपैकी एक शाळा म्हणून नावारुपास आली आहे.आमच्या शाळेला सुट्टी नसतेविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण २४ तास व सात दिवस तत्पर असले पाहिजे, या धारणेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम म्हणतात, आमच्या शाळेला सुट्टीच नसते. शाळेचा दिवस असो की सुट्टीचा दिवस असो दररोज आम्ही विद्यार्थ्यांसाठी शाळा भरवितो. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ ही शाळेची वेळ निश्चित ठेवली आहे. सुट्टीच्या दिवशी अधिकचा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना नवोदय, शिष्यवृत्ती, इतर स्पर्धांसाठी तयार करण्यात ते मश्गूल असतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

टॅग्स :Teacherशिक्षक