शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शिक्षक दिनविशेष; गोंदिया जिल्ह्यात शिक्षकाने बंद शाळेला दिली संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 10:58 IST

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती.

ठळक मुद्देजिव्हाळ्यातून घडविली शाळाछत्तीसगडी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीत केले बोलके

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती. शुध्द मराठीत बोलणे तर नाहीच पण झाडीबोलीचेही शब्द त्यांच्या तोंडातून येत नव्हते. एकेकाळी स्वातंत्रदिनी झेंडावंदनाला शाळेतील दोनच शिक्षक सोडले तर गावातील विद्यार्थी व पालकही उपस्थित रहात नव्हते. अश्या गावातील विद्यार्थ्यांना मराठीत बोलके करून शाळा सुरू करण्याचे काम येथील शिक्षक मंगलमूर्ती किशन सयाम यांनी केले आहे.गोंदिया जिल्ह्यातील ११४ गावे नक्षल कारवाईसाठी प्रसिद्ध असून महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील गावे ही नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखली जातात. देवरी तालुक्याच्या रेहळी या गावात शिक्षक मंगलमूर्ती सयाम ३ आॅगस्ट २०१२ मध्ये रूजू झाले. त्या गावात कुणालाही मराठीचा गंध नव्हता. वाचन करताना किंवा बोलताना विद्यार्थ्यांना अडचण जात होती. शाळेकडे अनेक मुलांची पाठ होती. मंगलमूर्ती यांनी पालकांशी दिवसरात्र संवाद साधणे सुरू केले. पालकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्या गावातील लोकांच्या मुलांना शिक्षणाची गोडी कशी लागेल याचा अभ्यास करून त्यांनी लोकांशी सतत संवाद साधून आपलेसे केले. लोकांची मने जोडण्यासाठी रात्रकालीन स्रेहसंमेलन, प्रौढ कबड्डी स्पर्धा व अनेक लोकोपयोगी कार्यक्रम शाळेत घेतले. शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण इतरही विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी स्वत:ची दोन्ही मुलांची नावे त्यांनी या शाळेत दाखल करून त्यांच्यापासून प्रवेश वाढवा उपक्रमाला सुरूवात केली. शिक्षक सयाम यांच्या कार्याची चर्चा परिसरात गावात गेली. परिणामी त्यांच्या हातून उत्तम विद्यार्थी घडताहेत हे ऐकून परिसरातील केशोरी, वांढरा, डोंगरगाव व चिचगड या गावातील २९ विद्यार्थी त्यांच्या शाळेत दाखल झाले. ते रूजू झाले तेव्हा ७० पटसंख्या होती आता येथे ११५ विद्यार्थी आहेत. अवघड क्षेत्रात असलेल्या या शाळेचा आदर्श घेण्यासाठी जिल्ह्यातील ४० शाळांनी त्या शाळेला भेट दिली आहे. आजघडीला ही शाळा जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळांपैकी एक शाळा म्हणून नावारुपास आली आहे.आमच्या शाळेला सुट्टी नसतेविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण २४ तास व सात दिवस तत्पर असले पाहिजे, या धारणेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम म्हणतात, आमच्या शाळेला सुट्टीच नसते. शाळेचा दिवस असो की सुट्टीचा दिवस असो दररोज आम्ही विद्यार्थ्यांसाठी शाळा भरवितो. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ ही शाळेची वेळ निश्चित ठेवली आहे. सुट्टीच्या दिवशी अधिकचा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना नवोदय, शिष्यवृत्ती, इतर स्पर्धांसाठी तयार करण्यात ते मश्गूल असतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

टॅग्स :Teacherशिक्षक