शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:32 IST

शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : बाम्हणी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.सडक अजुनी तालुक्यातील बाम्हणी खडकी येथे शेंडा जि.प.क्षेत्राच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष गायत्री इरले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत राऊत, शिक्षण सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य सरिता कापगते, रत्नदीप दहिवले, जागेश्वर धनबाते, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, कृपासागर जनबंधू, युवा संकल्पचे संतोष वालदे, विलास कापगते, प्रकाश पुराम, मार्कंड परिहार, साधू लिल्हारे, हरिष तोडसकर, नितीन भालेराव, सरपंच सिंधू बारसागडे, दिपा गहाणे, प्रकाश मडावी, मोहन सुरसाऊत, माणिक घनाडे, पुष्पा खोटेले, भरत मडावी, जगदीप खंडाते, अंताराम मडावी उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र आणि राज्यातील सरकारला चार वर्षांचा कार्यकाळ लोटूनही सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व छोट्या व्यावसायीकांना दिलासा मिळाला नाही. उलट त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जी.एस.टी.,नोटबंदी सारख्या अडचणींना गोरगरीबांना सामोरे जावे लागले.पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट केली जात आहे. शेतकºयांना सरळ मार्गाने कर्जमाफी न देता आॅनलाईनचा तिढा समोर करुन सरकारने जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहे. तर कर्जमाफीचा घोळ अद्यापही संपलेला नसून शेतकरी अजुनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. एकट्या महाराष्ट्रात मागील चार वर्षात बारा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर हजार रुपयांवर पोहचला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणारे रॉकेल सुध्दा मिळणे बंद झाल्याने त्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी खेळणाºया सरकारला जनतेची धडा शिकविण्याची गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या दरम्यान शेंडा जि.प. क्षेत्रांतर्गत येणाºया सरपंच, उपसरपंचाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक जि.प.सदस्य सरिता कापगते यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत राऊत यांनी केले तर आभार विलास कापगते यांनी मानले.