शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशाच्या रक्षणार्थ सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण

By admin | Updated: February 4, 2017 01:35 IST

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो.

अभिमन्यू काळे : ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा गोंदिया : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो. शत्रूंचा हल्ला झाल्यास आपण मुलभूत गरजांपेक्षा सुरिक्षत राहण्याकडे लक्ष देतो. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी काळे यांनी, आपण आपल्या हक्कांबाबत लढत असतो. हक्क मागण्याचे जे अधिकार प्राप्त झाले ते सैनिकांमुळे. ते देशाच्या रक्षणासाठी कठीण परिस्थितीचा सामना करीत असतात. आपण त्यांच्यामुळे आज सुरिक्षत जीवन जगत असल्याचे सांगितले. तर डॉ.पुलकुंडवार यांनी, सैनिक त्याग करु न देशासाठी लढतात. त्यांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्र म आयोजित करण्यात येतात. देशासाठी वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. अशा कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी जास्तीत जास्त निधी संकलीत करु न त्यांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जवळे यांनी, देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा त्याग महत्वाचा आहे. देशसेवा कठोरपणे करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. त्यांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या कामास सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. प्रास्ताविकातून कॅप्टन लिमसे यांनी ध्वजदिन निधीचे महत्व, सैनिकांसाठी असलेल्या योजना, पाल्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी करण्यात येत असलेल्या मदतीबाबतची माहिती दिली. आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले. कार्यक्र माला माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे कुटुंबिय व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ाावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झालेल्या आस्मा खान, तृप्ती बिसेन यांचा सत्कार तर गायत्री पटले, सोनू बांगरे, सुधांशू बावनथडे या माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी २० हजार रु पयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. वीर पत्नी किरण पटले, राजश्री क्षीरसागर, वीर माता रुख्मीनी बिसेन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तर जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचे सन २०१६ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, सार्वजनिक न्यासच्या सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, सालेकसा व अर्जुनी/मोरगावचे दुय्यम नोंदणी निरिक्षक, तहसिलदार गोंदिया, अप्पर तहसिलदार गोंदिया, तहसिलदार गोरेगाव, सालेकसा, आमगाव, देवरी, तिरोडा व अर्जुनी/मोरगाव गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.