शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
4
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
7
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
9
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
10
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
11
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
12
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
13
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
14
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
15
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
16
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
17
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
18
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
19
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
20
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !

धान बुडविणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा

By admin | Updated: October 5, 2015 01:59 IST

धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा,

खासदारांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्र्यांकडे कैफियतगोंदिया : धान उत्पादक पट्ट्यात आदिवासी विकास महामंडळाकडून भरडाईकरिता घेतलेला कोट्यवधी रुपयांचा धान भरडाई करून न देणाऱ्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याचे खासदार तथा भाजपाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. गोंदियात शनिवारी रात्री ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.देवरी, आमगावमधील कार्यक्रम आटोपून गोंदियात आले असताना खा.नेते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आदिवासी विकास महामंडळाने राईस मिलर्सना धान भरडाई करण्यासाठी देताना तेवढ्या धानाची अनामत रक्कम भरून घेणे गरजेचे आहे. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने मिलर्सकडून कोणतीही अनामत रक्कम न घेता त्यांना ४०० ते ५०० कोटी रुपयांचा धान भरडाईसाठी दिल्याचे खा.नेते म्हणाले. राईस मिलर्सने अजूनपर्यंत तो धान भरडाई करून दिला नाही. त्यात गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सर्वाधित आहेत. वास्तविक त्या धानाची रक्कम मिलर्सकडून व्याजासह वसूल करणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्या राईस मिलर्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली असल्याचे खा.नेते यांनी सांगितले.गोदामांअभावी आदिवासी विकास महामंडळाला शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान दरवर्षी उघड्यावर टाकावा लागतो. तो धान नंतर खराब होऊन कवडीमोल भावात विकावा लागतो. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याकडेही नेते यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.महामार्गाच्या विकासाचे गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार असून पाच महामार्ग चारपदरी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकास कामांसाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचेही खा.नेते यांनी यावेळी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)आमगावात पुन्हा घेणार आढावाखा.अशोक नेते यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आमगाव-देवरी-सालेकसा या तीन तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि कोणकोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल हे जाणून घेण्यासाठी खा.नेते यांनी शनिवारी आमगाव येथे आढावा बैठक आयोजित केली होती. पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला मात्र २६ विभाग प्रमुखांनी दांडी मारली. त्यामुळे नेते यांनी त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. सोबतच ही बैठक रद्द करून पुन्हा आमगावात आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले.