शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जेसीबीने कालव्याची पाळ तोडणाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे

काचेवानी : बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे विभागाचे अमीन व सहकर्मी उपस्थित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी होती, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाणी सुरू असताना कसलीही तोडफोड किंवा नवीन पाण्याची पायली देता येत नाही. परंतु प्रभारी अभियंत्याने मोबाईल कॉल रिसीव्ह करण्याचे टाळल्याने शेतकऱ्यांचे डोके तापले आहे. काचेवानीजवळ जमुनिया फाट्यावर (उपकालवा) येथे मुख्या पाण्याची पायली असताना सुनियोजित योजनेने जेसीबीने कालवा कापून वेगळ्या जागेतून पाणी नेण्याची व्यवस्था स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कालवा कापल्याने सिंदीटोला व बेरडीपार येथील शेतकऱ्यांना टेलवर पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बेरडीपार येथील शेतकरी धनराज पटले, पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत, मिलिंद राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कालवा जेसीबीने कापल्यामुळे संताप व्यक्त केला. तसेच बोदलकसा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. पाच दिवसांच्या सुट्ट्या आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूपयांची उकळणी करून कालवा कापण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली किंवा स्वत: पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच कापले. आता शेतकऱ्यांची ओरड होणार असल्याचे पाहून प्रभारी शाखा अभियंत्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकूण घेणे गरजेचे समजले नाही, असा आरोप केला जात आहे. बोदलकसाचे शाखा अभियंता आगाशे यांनी दुरध्वनीवरून सांगितले की, चालू पाण्याच्या प्रवाहातून नवीन पायली देता येत नाही आणि मायनर कापल्या किंवा तोडल्या जावू शकत नाही. आपण सध्या प्रशिक्षणाला असून बाहेर आहोत, असे ते म्हणाले. प्रभारी शाखा अभियंता आणि प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकरी पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या प्रकाराबाबत क्षेत्राचे अमीन, प्रभारी शाखा अभियंता व प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होवू शकला नाही. कालवा सुरू करण्यापूर्वी त्यात दुरूस्ती केली जावू शकते. परंतु पाणी सोडल्यानंतर कालव्याचा कापणे हे गुन्ह्याचे प्रकार ठरते. मायनर कापल्याने गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई केल्या जावू शकते. मात्र पाटबंधारे विभागाने याला गांभीर्याने घेतले नाही. उलट त्या काळात शासकीय सुट्ट्यांची संधी स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप बेरडीपारचे शेतकरी ईश्वर मेश्राम, जयकुमार रिनाईत यांनी केला आहे. तिरोडा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश जी. पालांदूरकर यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व कालवा कापणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)