शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

जेसीबीने कालव्याची पाळ तोडणाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे

काचेवानी : बोदलकसा कालव्याच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांत मोठाच आक्रोश आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेवून कालव्याची पाळ जेसीबीने तोडण्याची परवानगी दिली. पाळ तोडताना पाटबंधारे विभागाचे अमीन व सहकर्मी उपस्थित असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी होती, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाणी सुरू असताना कसलीही तोडफोड किंवा नवीन पाण्याची पायली देता येत नाही. परंतु प्रभारी अभियंत्याने मोबाईल कॉल रिसीव्ह करण्याचे टाळल्याने शेतकऱ्यांचे डोके तापले आहे. काचेवानीजवळ जमुनिया फाट्यावर (उपकालवा) येथे मुख्या पाण्याची पायली असताना सुनियोजित योजनेने जेसीबीने कालवा कापून वेगळ्या जागेतून पाणी नेण्याची व्यवस्था स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कालवा कापल्याने सिंदीटोला व बेरडीपार येथील शेतकऱ्यांना टेलवर पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. बेरडीपार येथील शेतकरी धनराज पटले, पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत, मिलिंद राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कालवा जेसीबीने कापल्यामुळे संताप व्यक्त केला. तसेच बोदलकसा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. पाच दिवसांच्या सुट्ट्या आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूपयांची उकळणी करून कालवा कापण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली किंवा स्वत: पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच कापले. आता शेतकऱ्यांची ओरड होणार असल्याचे पाहून प्रभारी शाखा अभियंत्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकूण घेणे गरजेचे समजले नाही, असा आरोप केला जात आहे. बोदलकसाचे शाखा अभियंता आगाशे यांनी दुरध्वनीवरून सांगितले की, चालू पाण्याच्या प्रवाहातून नवीन पायली देता येत नाही आणि मायनर कापल्या किंवा तोडल्या जावू शकत नाही. आपण सध्या प्रशिक्षणाला असून बाहेर आहोत, असे ते म्हणाले. प्रभारी शाखा अभियंता आणि प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकरी पूरण ठाकरे, जयकुमार रिनाईत यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या प्रकाराबाबत क्षेत्राचे अमीन, प्रभारी शाखा अभियंता व प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्याशी लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होवू शकला नाही. कालवा सुरू करण्यापूर्वी त्यात दुरूस्ती केली जावू शकते. परंतु पाणी सोडल्यानंतर कालव्याचा कापणे हे गुन्ह्याचे प्रकार ठरते. मायनर कापल्याने गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई केल्या जावू शकते. मात्र पाटबंधारे विभागाने याला गांभीर्याने घेतले नाही. उलट त्या काळात शासकीय सुट्ट्यांची संधी स्वत: पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप बेरडीपारचे शेतकरी ईश्वर मेश्राम, जयकुमार रिनाईत यांनी केला आहे. तिरोडा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश जी. पालांदूरकर यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व कालवा कापणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)