शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

७ लाखाचे बक्षी असलेल्या नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण : ११ वर्षापासून नक्षल चळवळीत होता सक्रीय

By नरेश रहिले | Updated: June 19, 2024 19:44 IST

गोंदिया पोलीसांची यशस्वी कामगिरी

नरेश रहिले, गोंदिया : जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम करणारा तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -१, व (सी.एन. एम.) चेतना नाटय मंच मध्ये काम करणारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलिस नक्षल चकमकीत काम करणाऱ्या जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा. पुसनार, ता. गंगालूर, जि. बिजापूर ( छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर ७ लाखाचे बक्षीस होते.

देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबवित आहे. या आत्मसमर्पीत नक्षलवादी बीच्छेम याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष नक्षलवाद्यांच्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी आत्मसमर्पण केले आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम याने सन २०१७-२०१८ मध्ये प्लॉटून-१ मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल- पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग होता.माओवाद्यांच्या भूलथापाला बळी पडू नकामाओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत. त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.आत्मसमर्पीत होण्याची सांगितली कारणे- नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण खालील कॅडर ला कळत नाही. भविष्य अंधकारमय वाटतो. माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळी करीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.- शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही. माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन घेतात.- दलममध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतीही अडचण असली तरीही मदत करता येत नाही. दलममध्ये असतांना वेळेवर जेवण मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते. आरोग्या विषयीं समस्या, उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.- पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते. वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला असे बीच्छेम चे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgondiya-acगोंदिया