शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जेव्हा पाण्याची किमत कळते आणि प्रत्यक्ष पाण्याची टंचाई भासते तेव्हा पाण्याचा महत्त्व कळते. यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण तालुक्यात असे कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या मानाकुही प्रकल्पाकडे शासनाची वक्रदृष्टी झाल्याने या प्रकल्पाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. तालुक्यातील ८० ते ९० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी आणि आधारित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अशात सिंचनाची सोय असलेली शेती महत्त्वाची असून, सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात. ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गोर्रे-मानागढ-रामाटोला मार्गाच्या निकट पर्वत रागांच्या पायथ्यालगत मानाकुही प्रकल्प तयार करण्याचा निर्णय शासनाने १९७८ मध्ये घेतला होता. त्यानंतर ०.७९० दशलक्ष घनमीटर पाण्याची  साठवण क्षमता असलेला जलाशय तयार करण्यात आले. त्याला एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. पाण्याचे वितरण शेतीपर्यंत वितरण व्हावे म्हणून कालवा तयार केला नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. 

मानाकुही प्रकल्प किती उपयोगाचा- मानाकुही तलावाच्या गेटमधील दुरुस्ती कायम स्वरूपाची करून शेतीला सिंचन करण्यासाठी ७.५० कि.मी.चा मुख्य कालवा आणि ६.२ कि.मी.चा उपकालवा तयार केल्यास मानागड, रामाटोला, शिकारीटोला, भरीटोला, कुलरभट्टी या गावातील जवळपास २१९ हेक्टरपेक्षा जास्त शेतीला खरीप आणि रबी दोन्ही हंगामात पाणी मिळू शकते. सोबतच मानाकुही जलाशयात अतिरिक्त जलसाठा वाढल्यास तो पाणीनजीकच्या मानागड तलावात सोडण्याची व्यवस्था झाली, तर वाया जाणारा पाणी उपयोगात येऊ शकतो तो पाणी सालेकसा शहराला पाणीटंचाईच्या वेळी उन्हाळ्यात मोठा लाभदायक ठरू शकतो.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण