शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जेव्हा पाण्याची किमत कळते आणि प्रत्यक्ष पाण्याची टंचाई भासते तेव्हा पाण्याचा महत्त्व कळते. यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण तालुक्यात असे कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या मानाकुही प्रकल्पाकडे शासनाची वक्रदृष्टी झाल्याने या प्रकल्पाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. तालुक्यातील ८० ते ९० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी आणि आधारित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अशात सिंचनाची सोय असलेली शेती महत्त्वाची असून, सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात. ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गोर्रे-मानागढ-रामाटोला मार्गाच्या निकट पर्वत रागांच्या पायथ्यालगत मानाकुही प्रकल्प तयार करण्याचा निर्णय शासनाने १९७८ मध्ये घेतला होता. त्यानंतर ०.७९० दशलक्ष घनमीटर पाण्याची  साठवण क्षमता असलेला जलाशय तयार करण्यात आले. त्याला एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. पाण्याचे वितरण शेतीपर्यंत वितरण व्हावे म्हणून कालवा तयार केला नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. 

मानाकुही प्रकल्प किती उपयोगाचा- मानाकुही तलावाच्या गेटमधील दुरुस्ती कायम स्वरूपाची करून शेतीला सिंचन करण्यासाठी ७.५० कि.मी.चा मुख्य कालवा आणि ६.२ कि.मी.चा उपकालवा तयार केल्यास मानागड, रामाटोला, शिकारीटोला, भरीटोला, कुलरभट्टी या गावातील जवळपास २१९ हेक्टरपेक्षा जास्त शेतीला खरीप आणि रबी दोन्ही हंगामात पाणी मिळू शकते. सोबतच मानाकुही जलाशयात अतिरिक्त जलसाठा वाढल्यास तो पाणीनजीकच्या मानागड तलावात सोडण्याची व्यवस्था झाली, तर वाया जाणारा पाणी उपयोगात येऊ शकतो तो पाणी सालेकसा शहराला पाणीटंचाईच्या वेळी उन्हाळ्यात मोठा लाभदायक ठरू शकतो.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण