शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जेव्हा पाण्याची किमत कळते आणि प्रत्यक्ष पाण्याची टंचाई भासते तेव्हा पाण्याचा महत्त्व कळते. यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण तालुक्यात असे कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या मानाकुही प्रकल्पाकडे शासनाची वक्रदृष्टी झाल्याने या प्रकल्पाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. तालुक्यातील ८० ते ९० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी आणि आधारित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अशात सिंचनाची सोय असलेली शेती महत्त्वाची असून, सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात. ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गोर्रे-मानागढ-रामाटोला मार्गाच्या निकट पर्वत रागांच्या पायथ्यालगत मानाकुही प्रकल्प तयार करण्याचा निर्णय शासनाने १९७८ मध्ये घेतला होता. त्यानंतर ०.७९० दशलक्ष घनमीटर पाण्याची  साठवण क्षमता असलेला जलाशय तयार करण्यात आले. त्याला एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. पाण्याचे वितरण शेतीपर्यंत वितरण व्हावे म्हणून कालवा तयार केला नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. 

मानाकुही प्रकल्प किती उपयोगाचा- मानाकुही तलावाच्या गेटमधील दुरुस्ती कायम स्वरूपाची करून शेतीला सिंचन करण्यासाठी ७.५० कि.मी.चा मुख्य कालवा आणि ६.२ कि.मी.चा उपकालवा तयार केल्यास मानागड, रामाटोला, शिकारीटोला, भरीटोला, कुलरभट्टी या गावातील जवळपास २१९ हेक्टरपेक्षा जास्त शेतीला खरीप आणि रबी दोन्ही हंगामात पाणी मिळू शकते. सोबतच मानाकुही जलाशयात अतिरिक्त जलसाठा वाढल्यास तो पाणीनजीकच्या मानागड तलावात सोडण्याची व्यवस्था झाली, तर वाया जाणारा पाणी उपयोगात येऊ शकतो तो पाणी सालेकसा शहराला पाणीटंचाईच्या वेळी उन्हाळ्यात मोठा लाभदायक ठरू शकतो.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण