शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

२० हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:24 PM

जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.

ठळक मुद्देअर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक ५१२७ हेक्टर : खरिपाने जागवली शेतकऱ्यात आशा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.यंदा पावसाने शेतकऱ्यांना वेळीच साथ दिल्याने खरिपाचा हंगाम भरभरून निघाला. कधी नव्हे एवढे धानाचे उत्पादन यंदा झाले असून शेतकरी चांगलाच खुश दिसत आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या खेळीने हतबल होवून बसलेला शेतकरी खरिपाच्या निकालाने आता जोमात असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यात यंदाही सिंचनाची सोय नसतानाही शेतकरी आहे त्या साधनांतून उन्हाळी घेण्याची तयारी दाखवित आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जात नसतानाही सिंचनाची सोय असलेले शेतकरीच उन्हाळीसाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. तरिही एवढ्या मोठ्या क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आल्याने खरिपासोबतच आता उन्हाळीही शेतकºयांना भरभरून पावणार असल्याचे दिसते.विशेष म्हणजे, जिल्हयात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधीक ५ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळीची भाताची लागवड करण्यात आली आहे. तर गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी आहे.तिपटीने उन्हाळीच्या क्षेत्रात वाढजिल्ह्यात ७ हजार ७६० एवढे उन्हाळीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. म्हणजेच, किमान एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड अपेक्षीत असते. मात्र यंदा तिपटीने म्हणजेच २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. यावरून धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षींपासून लागलेली अवकळा लोपली असल्याचे म्हणता येईल. यंदा खरिपाने शेतकऱ्यांना ‘छप्पर फाडके’ दिले असतानाच उन्हाळीही भरभरून निघाल्यास धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघणार.बोअरवेलचे खोदकाम वाढलेप्रकल्पांतील पाण्याची स्थिती व उन्हाळ््यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:ची सिंचनाची सोय आहे तेच उन्हाळी घेत आहेत. शिवाय शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आता शेतकरी बोअरवेल खोदकामाकडे वळला आहे. यामुळे मात्र आता भूगर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार यात शंका नाही.