शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

घटत्या जनावरांमुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात पशुधन झाले कमी : दुग्ध व्यवसाय डबघाईस

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : भारत हा कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याचे म्हटले जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर्षात पशुधनात प्रचंड घट झालेली दिसून येत आहे. आता खेड्यांमध्येही पॅकेटचे दुध मिळू लागले आहे.ग्रामीण भागामध्ये जनावरे चराई करिता जागा राखीव असायची व गुराखी असायचा. परंतु आज जनावरे चराई करिता गुराखी मिळत नाही. तर चराईच्या जागेवर अतिक्र मण झाले आहे. वैरनाला महागाईची झळ बसली आहे असून दुधाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. देशी जनावरांकडून जास्त दूध उपलब्ध होत नाही, तर संकरित जनावरे शेतकरी विकत घेऊ शकत नाहीत.दुग्ध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या योजना असल्या तरी या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करावी. जेणेकरून ग्रामीण भागातील पशुपालक जनावरे पाळून दुग्धव्यवसाय करू लागतील.यंत्रांचे आगमन आले अंगलटपूर्वी उच्च जातीच्या देशी गाई शेतकरी पाळत होते व त्यापासून शेतकऱ्यांना कष्टाळू बैल मिळायचे. परंतु शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांनी गोधन पाळणे बंद केले आहे. पूर्वी १०-२० एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे २-३ बैलजोडी असायच्या. आज या बैलजोड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.