शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:17 IST

नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना व्हावे लागले विद्यार्थी : येडमागोंदी शाळा ठरत आहे आदर्श

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे. येथील शाळेतील ३१ विद्यार्थी टॅबवर शिक्षण घेत आहेत.महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून गडचिरोली जिल्ह्यापासून २ किमी अंतरावरील व गोंदियापासून १२० किमी अंतावरी डोंगराच्या कुशीत येडमागोंदी हे गाव वसलेले आहे. ४०० लोकसंख्या असलेले छोटेशे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मिसपिरी केंद्रात आहे. हे संपूर्ण गाव आदिवासींचे आहे. डोंगरानी वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त, गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.कल्पनेला भरारीचे पंख देत त्यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी तयार केले. यासाठी शिक्षकांना आधी विद्यार्थी व्हावी लागले. मूळात मराठी असलेल्या या शिक्षकांना आधी छत्तीसगडी भाषा शिकावी लागली व त्यांनी ती भाषा शिकून नंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविली. ही सर्व किमया डाएटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या नेतृत्वात डॉ. किरण धांडे, सूचित्रा जाधव, संदीप सोमवंशी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे यांच्या मदतीने केली. या लोकांनी या शाळेचा अध्ययन स्तर वाढविण्यासाठी येडमागोंदी शाळेला अनेक भेटी दिल्यात.दोन शिक्षक असलेल्या येडमागोंदी शाळेत ३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विविध उपक्रम घेऊन सदाशिव पाटील नावाच्या शिक्षकाने रमेश बोरकर यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषयात प्रगत केले. ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: कविता व गोष्टी तयार करतात. या विद्यार्थ्यांची बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी असली तरी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलतात.परिणामी ही शाळा १०० टक्के प्रगत म्हणून नावारुपास आली.‘जे राव न करे-ते गाव करे’ चा प्रत्यय येडमागोंदी या गावात आला. येथे पालक व शिक्षकांत उत्तम समन्वय आहे.गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळा डिजीटल व टॅबयुक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा ७० हजार रुपयांची शाळेला मदत केली. गावकरी व शिक्षकांनी मिळून डिजीटल, टॅबयुक्त व गुणवत्ता पूर्ण शाळा तयार केली. या शाळेतील विद्यार्थी टॅबचा वापर करतात.

टॅग्स :educationशैक्षणिक