शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

डीबीटी विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 9:19 PM

शासकीय वसतिगृह असलेली खाणावळ बंद करुन डीबीटी योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाची थेट रक्कम जमा करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी घेतला.

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थी रस्त्यावर : वसतिगृहातच जेवण देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शासकीय वसतिगृह असलेली खाणावळ बंद करुन डीबीटी योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाची थेट रक्कम जमा करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी घेतला. हा डीबीटी निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांकरीता अन्यायकारक असून तो त्वरीत रद्द करुन पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्याना वसतिगृहात जेवण देण्यात यावे. या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाने गुरुवारी (दि.१९) रखरखत्या उन्हात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.डीबीटी योजना कायमस्वरुपी बंद करुन पूर्ववत करण्यात यावी, वस्तीगृहाची खाणावळ नियमित पूर्ववत चालू ठेवण्यात यावी, डिबीटी संदर्भातील ५ एप्रिल २०१८ चा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुरक्षा अधिनियम बनविण्यात यावे जेणेकरुन कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही, अल्पसंख्याक मुस्लीम विद्यार्थी सुद्धा राज्याचा अभिन्न घटक असून त्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत व स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) त्वरीत सुरु करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची क्रिमीलेअरची अट रद्द करुन सरसकट इतर जाती-जमाती प्रमाणे त्यांनाही शिष्यवृत्ती बहाल करण्यात यावी आदि मागण्यांना घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.राणी दुर्गावती चौकात राणी दुर्गावतीच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. ‘डीबीटी हटाओ-होस्टेल बचाओचा’ नारा देत मोर्चा चिचगड मार्गाने प्रकल्प कार्यालयावर धडकला. तोंडावर काळी पट्टी बांधून शासनाच्या डीबीटी निर्णयाचा विरोध करीत विद्यार्थ्यांनी जोरदार नारेबाजी करीत मोर्चा काढला. दरम्यान प्रकल्प कार्यालयात जावून सहायक प्रकल्प अधिकारी भोंगाडे यांना मुख्यमंत्री व राज्यपाला यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. मोर्चात आदिवासी विद्यार्थी संघाचे आदेश उईके, प्रियंका बवर, लीलाधर कोरेटी, नरेश नेताम, योगराज सासुरवार, वंदना नेताम, रेखा मडावी, मानकुवर सेवंता, उषा घरत, चेतन उईके, शालु पंधरे, सुनिता गावळकर, अर्चना ताराम व्यतिरीक्त शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.