शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:19 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बºयापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतीच्या कामाला वेग : अनेक ठिकाणी रोवणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बऱ्यापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.यंदा मृग नक्षत्राची सुरुवात चांगल्या पावसाने झाली होती. परंतु त्यानंतर पूर्ण मृग नक्षत्र कोरडा गेला. एवढेच नव्हे तर भरपूर पाऊस पडणारा आद्रा नक्षत्र सुद्धा कोरडा गेला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता सावध पवित्रा घेतला व पेरणी रोखून थांबविली. मात्र काही शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी केली. त्यानंतर सतत १५ दिवस पाऊस पडला नाही आणि पºहे अर्धे उगवलेच नाही. ज्यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात पेरणी केली आता त्यांचे पºहे उगवले. परंतु पाणी असून सुद्धा नर्सरी आखूड असल्याने रोवणी योग्य झाल्या नाहीत. त्यामुळे आणखी एक आठवडा रोवणीला सुरुवात करायला उशीर होऊ शकतो.या दरम्यान ज्यांची नर्सरी वाढीत आली, त्यांनी रोवणी सुरु केली आहे. सतत पाऊस पडत राहिला तर सर्वांच्या रोवण्या जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार, असे चित्र आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला जोमाने सुरूवात झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.काही भागात अजूनही दमदार पावसाची वाटतालुक्यातील झालीया, कावराबांध, बिंझली परिसरात तसेच सोनपुरी, बाम्हणी परिसरात अजून दमदार पावसाची वाट शेतकरी बघत आहे. या भागात कोरडवाहू रेताळ किंवा खडकाळ जमीन असल्याने शेतात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. या भागात सतत आठ दिवस पर्जन्यमान झाल्याशिवाय जल संग्रहण होत नाही. अजूनही या भागात रोवणीला खरी सुरुवात झाली नाही. शेतकरी दमदार पावसाची वाट आहे. यातच सालेकसा, पिपरीया, दरेकसा, बिजेपार आदी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस