शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका

By admin | Updated: April 12, 2015 01:32 IST

मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

सालेकसा : मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. झाडावरील कोवळ्या कैऱ्याखाली पडून वाया गेल्या आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे व अमराई मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. साधारणत: आंब्याचे उत्पादनाचा विचार केला तर कोणत्या वर्षी पीक फार कमी असते तर कोणत्यावर्षी भरघोष उत्पादन मिळते असे सततचे अनुभव शेतकऱ्यांना होत असते. मागील वर्षी आंब्याचे उत्पादन फारच कमी होते. त्यामुळे गावरान आंब्याच्या स्वाद घेणाऱ्यांना सुध्दा बैगनपल्ली आंब्याचे काम चालवावे लागले. यंदा गावरान आंब्याच्या प्रत्येक झाडाला भरपूर बहर आला होता. काही दिवसापूर्वी आमवृक्षांना सुवासिक बहर असताना वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता. त्यामुळे आमवृक्षांचा बहर मोहर खाली झडून पडला. भावी भरघोष उत्पादनावर फटका बसला. आता मागील दोन दिवसापूर्वी आलेला जोरदार वादळी वारा आणि पाऊस यामुळे झाडाला लागलेले कोवळे आंब्याचे फळ तुडून खाली पडले. छोटे छोटे कोवळे फळ असल्याने ते कोणाच्या उपयोगाचे नसतात. त्यामुळे खाली पडलेले सर्व कोवळे फळ माती पलीत झालेले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे उत्पादन यंदा निम्यावर आल्याचे दिसून येत आहे. आंब्याच्या नुकसानीच्यासुध्दा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावरान आंबा कच्चा असो किंवा पिकलेला असो तो खाण्यासाठीच नाही तर विविध पेय, लोणच, चटणी, पने, आमटी, आमचूर, मुरब्बा असा असंख्य उपयोगात आणला जातो. (प्रतिनिधी)