शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

भू-माफिया व गुंडांच्या अत्याचाराला रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

नगर परिषद व लगतच्या ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून ज़मीन व प्लाॅटच्या धंद्यात लिप्त काही लोकं चुकीच्या पद्धतीने प्लॉटवर कब्जा करणे तसेच एकच प्लॉट अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. असे प्रकार कित्येकदा उद्भवले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडित अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कार्यवाही करीत नाही, किंवा अपराधिक गतिविधीत लिप्त भू-माफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शहरात भू-माफिया व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी केली जात आहे. या अत्याचाराला रोखण्यात यावे  अशी मागणी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली असून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात, नगर परिषद व लगतच्या ग्रामीण परिसरात काही वर्षांपासून ज़मीन व प्लाॅटच्या धंद्यात लिप्त काही लोकं चुकीच्या पद्धतीने प्लॉटवर कब्जा करणे तसेच एकच प्लॉट अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत. असे प्रकार कित्येकदा उद्भवले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडित अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कार्यवाही करीत नाही, किंवा अपराधिक गतिविधीत लिप्त भू-माफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो. अशाच जमीन खरेदी विक्री व्यवसायात जीव घेण्यासाठी लोक मागेपुढे बघत नाही. २८ जानेवारी रोजी धनेंद्र भुरले या सामाजिक कार्यकर्त्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार करुन त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला व या प्रकरणातून याची प्रचिती येते. अशा व या सारख्या प्रकरणात विशेष लक्ष देऊन आरोपींवर कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून जनता भयमुक्त जीवन जगू शकेल असे नमूद आहे. निवेदन देताना विविध सामाजिक संघटनांकडून डी.एस. मेश्राम, कैलास भेलावे, रमेश ब्राम्हणकर, सुनील भोंगाडे, लीलाधर पाथोडे, रमेश नामपल्लीवार, विठ्ठल भरणे, अतुल सतदेवे, मालती किन्नाके, हेमलता आहाके यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

अन्यथा तीव्र आंदोलन करणार - शहरात वाढत असलेले गोळीबार प्रकरण गंभीर होत चालले आहे. गुंड लोक अवैधरित्या शस्त्र बाळगतात. अशात त्यांच्यावर मोका अंतर्गत सक्त कार्यवाही करण्यात यावी. भुरले गोळीबार प्रकरण व अशा अन्य गंभीर प्रकरणात लिप्त गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची योग्य चौकशी करून सामान्य जनतेला न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भुरले गोळीबार प्रकरण व यासारख्या प्रकरणात प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची दिरंगाई केल्यास किंवा तपासात कमतरता आढळून आल्यास सर्वसामान्य जनतेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारासुद्धा सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस