शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:37 IST

मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे.

ठळक मुद्देमृगधारा बरसल्याने शेतकरी आनंदी : धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मृग नक्षत्र लागताच लगेच दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतावर पºहे टाकण्याची कामे जोमाने सुरु झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पऱ्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते.अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन सामान्यत: १२ जून पर्यंत होत असते. त्यानुसार १२ ते १६ जून दरम्यान एकदा पाऊस येण्याची दाट शक्यता असते. अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात ८ जूनपासून पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा लगेच पावसाने हजेरी लावल्याने आणि सगळ्यांना पेरणीची संधी लाभली.धान पेरणीची कामे साधारणत: जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केलेले उत्तम असते. परंतु पावसाच्या लहरीपणात कधीकधी पेरणी मागे पुढे होत असते.समाधानकारक पावसाची अपेक्षायंदा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास केला तर मान्सून चांगला येणार असून पिकासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजचा शेतकरी काही प्रमाणात आपल्या पारंपरिकरित्या पावसाचा अंदाज लावतात. परंतु आता जास्तीत जास्त शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवू लागला आहे. अनेकवेळा हवामान खात्याचे भाकित सुद्धा फोल ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी सावध पवित्रा घेत शेतीचे नियोजन तयार करतात.पाऊस कमी जास्त झाला तरी भरघोष पीक घेण्यासाठी नियोजनबद्ध शेतीची कामे करतात.कृषी केंद्रावर एकच गर्दीपेरणीची लगबग सुरु झाली असून अनेक शेतकरी दरवर्षी सुधारित वाणाचे बियाणे खरेदी करतात. काही शेतकरी संकरीत वाण टाकण्याला महत्व देतात. त्यासाठी कृषी केंद्रावर जाऊन नवीन वाणाच्या धानाची किंवा जास्त उत्पादन देणाºया वानाची खरेदी करु लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. अशात अनेक कृषी केंद्र चालक संधीचा उपयोग घेत गैरलाभ घेण्याचासुद्धा प्रयत्न करतात आणि बोगस बियाणेसुद्धा शेतकºयांच्या हातात थोपवितात. अशात प्रत्येक शेतकऱ्याने सावधतेने बियाणे खेरदी करुन पेरणी करावी. पेरणीची वेळ निघाल्यास उत्तम प्रतिची बियाणेसुद्धा कामाची राहत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी