शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वर्ग व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे.

ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशात विद्यार्थी बाधित होऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करावे अशी मागणी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीने उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे. ऑनलाइनची संकल्पना जरी चांगली असली तरी ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता व नेटवर्कची समस्या असल्याने ५० टक्के विद्यार्थी या प्रणाली पासून वंचित राहणार आहेत. तसेच २० ते २५ टक्के विद्यार्थी या प्रणालीला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ७५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी टीव्हीसारख्या माध्यमांद्वारे शिक्षण व मुलांच्या बुद्धीला चालना देणारे विविध उपक्रम देण्याचे नियोजन करावे. तसेच १५ जूनच्या शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू केल्यास संस्थाचालकांपुढे फर्निचर, फिजिकल डिस्टंन्सिग आणि विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांपुढे वर्गखोल्या व शिक्षकांची समस्या निर्माण होईल. त्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करताना नियोजनांतर्गत पुढील बाबींचा विचार करावा अशी मागणी केली आहे.तसेच, शैक्षणिक वर्षात जवळपास १५३ दिवस प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन कार्य होते. अशात १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात व जून ते सप्टेंबर महिन्यातील ७६ दिवसांच्या दिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून काही प्रमाणात भरून काढता येईल. वर्ग दहावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १३० दिवसांची गरज असून उर्वरित कार्यभार दिवस परीक्षा व परीक्षा पूर्वतयारीसाठी उपयोगी पडतात. १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शाळा सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात. त्यात दिवाळी, उन्हाळा व वर्षातील सार्वजनिक सुट्या कमी केल्यास जवळ-जवळ ४० ते ५० दिवस मिळतात.यासाठी शैक्षणिक सत्राचा कालावधी वाढवावा, दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये न घेता ३० दिवस पुढे वाढविण्यात याव्यात व अभ्यासक्रम २५ टक्के कमी करावा असेही निवेदनातून सूचविण्यात आले असून निवेदन देताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, उपाध्यक्ष अनिल मंत्री, कार्यवाह टी. एस. गौतम, के. सी शहारे उपस्थित होते.फक्त वार्षिक परीक्षा घ्या१ ऑक्टोबर पासून शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी करीत असतानाच संघटनेने वर्ग १ ते ८ तसेच ९ ते ११ ची फक्त वार्षिक परीक्षा घ्यावी व ती मे महिन्यात घेऊन निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर करावा. तसेच पुढील शैक्षणिक सत्र १ जुलै पासून सुरू करावे अशीही मागणी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या