शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष वर्ग व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे.

ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशात विद्यार्थी बाधित होऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करावे अशी मागणी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीने उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग बंद करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी अवलंब करावा असे सांगितले आहे. ऑनलाइनची संकल्पना जरी चांगली असली तरी ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता व नेटवर्कची समस्या असल्याने ५० टक्के विद्यार्थी या प्रणाली पासून वंचित राहणार आहेत. तसेच २० ते २५ टक्के विद्यार्थी या प्रणालीला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ७५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी टीव्हीसारख्या माध्यमांद्वारे शिक्षण व मुलांच्या बुद्धीला चालना देणारे विविध उपक्रम देण्याचे नियोजन करावे. तसेच १५ जूनच्या शासन परिपत्रकानुसार शाळा सुरू केल्यास संस्थाचालकांपुढे फर्निचर, फिजिकल डिस्टंन्सिग आणि विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांपुढे वर्गखोल्या व शिक्षकांची समस्या निर्माण होईल. त्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करताना नियोजनांतर्गत पुढील बाबींचा विचार करावा अशी मागणी केली आहे.तसेच, शैक्षणिक वर्षात जवळपास १५३ दिवस प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन कार्य होते. अशात १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात व जून ते सप्टेंबर महिन्यातील ७६ दिवसांच्या दिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून काही प्रमाणात भरून काढता येईल. वर्ग दहावी व बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी १३० दिवसांची गरज असून उर्वरित कार्यभार दिवस परीक्षा व परीक्षा पूर्वतयारीसाठी उपयोगी पडतात. १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष शाळा सुरू केल्यास १५३ दिवस मिळतात. त्यात दिवाळी, उन्हाळा व वर्षातील सार्वजनिक सुट्या कमी केल्यास जवळ-जवळ ४० ते ५० दिवस मिळतात.यासाठी शैक्षणिक सत्राचा कालावधी वाढवावा, दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये न घेता ३० दिवस पुढे वाढविण्यात याव्यात व अभ्यासक्रम २५ टक्के कमी करावा असेही निवेदनातून सूचविण्यात आले असून निवेदन देताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, उपाध्यक्ष अनिल मंत्री, कार्यवाह टी. एस. गौतम, के. सी शहारे उपस्थित होते.फक्त वार्षिक परीक्षा घ्या१ ऑक्टोबर पासून शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी करीत असतानाच संघटनेने वर्ग १ ते ८ तसेच ९ ते ११ ची फक्त वार्षिक परीक्षा घ्यावी व ती मे महिन्यात घेऊन निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर करावा. तसेच पुढील शैक्षणिक सत्र १ जुलै पासून सुरू करावे अशीही मागणी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या