शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला सुरुवात

By admin | Updated: October 14, 2016 02:13 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात जिल्ह्यात कावराबांध येथे आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आली.

कावराबांध येथे शुभारंभ : संजय पुराम, जिल्हाधिकारी काळे यांची उपस्थितीसालेकसा : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात जिल्ह्यात कावराबांध येथे आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची विशेष उपस्थिती होती.गुरूवार दि.१३ रोजी सालेकसा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. पहिला रस्ता कावराबांध ते खेडेपार मार्ग आणि दुसरा रस्ता टोयागोंदी चौकी ते बोईरटोला मार्ग आहे. या मार्गासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी ८३ लाख मंजूर झाले. कावराबांध येथे रस्त्याचे भूमिपूजन जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराम वडगाये यांच्या अध्यक्षतेत पार पडले. यावेळी आमदार संजय पुराम यांनी कुदळ मारुन पूजन केले.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, तहसीलदार प्रशांत सांगळे, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, माजी बांधकाम सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, पं.स.सदस्य प्रतिभा परिहार, सरपंच मंजु बनोठे, कोटजमुरा येथील सरपंच बबिता मेश्राम, मेहतर दमाहे, शंकर मडावी, खेमराज लिल्हारे, मनोज बोपचे, दिनेश सुलाखे, अशोक सोनटक्के व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.पुराम म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्याची वाईट परिस्थिती असल्यास याचा विकासावर मोठा परिणाम होतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करुन प्रत्येक गावांना पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून मुख्य मार्गाशी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात प्रथमच कावराबांध येथून या योजनेची सुरुवात होत आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रात या योजनेचा पुरेपूर लाभ घेत गावांना पक्क्या मार्गाने जोडण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे म्हणाले, रस्ते ही माणसे जोडण्याचे काम करतात व विकास वाटेवर रस्त्याच्या विकासाशिवाय कोणाचाच विकास होऊ शकत नाही. त्यामुळे पक्के रस्ते हीच विकासवाटेची पहिली ओळख आहे. शासन त्या दिशेने प्रयत्नशील आहे. यावेळी समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी ही विकासाच्या बाबतीत अधिकारी, पदाधिकारी यांनी समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.प्रास्ताविक यादन नागपुरे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी बद्रीप्रसाद दसरिया, चमन हटवार, चैनसिंह मच्छिरके, जगन्नाथ परिहार, नेतराम मच्छिरके, व्यंकट उके, निर्मल उपराडे, पुरुषोत्तम चंदनकर, गुमानसिंह उपराडे, जागेश्वर दसरिया, आडकूदास माहुले, पुरण दसरिया, पुरण डहारे, झनक दमाहे, ईश्वर बनोटे यांचे सहकार्य लाभले. संचालन भाजप महामंत्री राजेंद्र बडोले यांनी तर आभार महामंत्री मनोज बोपचे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)