शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला सुरुवात

By admin | Updated: October 14, 2016 02:13 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात जिल्ह्यात कावराबांध येथे आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आली.

कावराबांध येथे शुभारंभ : संजय पुराम, जिल्हाधिकारी काळे यांची उपस्थितीसालेकसा : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात जिल्ह्यात कावराबांध येथे आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची विशेष उपस्थिती होती.गुरूवार दि.१३ रोजी सालेकसा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. पहिला रस्ता कावराबांध ते खेडेपार मार्ग आणि दुसरा रस्ता टोयागोंदी चौकी ते बोईरटोला मार्ग आहे. या मार्गासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी ८३ लाख मंजूर झाले. कावराबांध येथे रस्त्याचे भूमिपूजन जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराम वडगाये यांच्या अध्यक्षतेत पार पडले. यावेळी आमदार संजय पुराम यांनी कुदळ मारुन पूजन केले.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, तहसीलदार प्रशांत सांगळे, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, माजी बांधकाम सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, पं.स.सदस्य प्रतिभा परिहार, सरपंच मंजु बनोठे, कोटजमुरा येथील सरपंच बबिता मेश्राम, मेहतर दमाहे, शंकर मडावी, खेमराज लिल्हारे, मनोज बोपचे, दिनेश सुलाखे, अशोक सोनटक्के व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.पुराम म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्याची वाईट परिस्थिती असल्यास याचा विकासावर मोठा परिणाम होतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करुन प्रत्येक गावांना पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून मुख्य मार्गाशी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात प्रथमच कावराबांध येथून या योजनेची सुरुवात होत आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रात या योजनेचा पुरेपूर लाभ घेत गावांना पक्क्या मार्गाने जोडण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे म्हणाले, रस्ते ही माणसे जोडण्याचे काम करतात व विकास वाटेवर रस्त्याच्या विकासाशिवाय कोणाचाच विकास होऊ शकत नाही. त्यामुळे पक्के रस्ते हीच विकासवाटेची पहिली ओळख आहे. शासन त्या दिशेने प्रयत्नशील आहे. यावेळी समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी ही विकासाच्या बाबतीत अधिकारी, पदाधिकारी यांनी समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.प्रास्ताविक यादन नागपुरे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी बद्रीप्रसाद दसरिया, चमन हटवार, चैनसिंह मच्छिरके, जगन्नाथ परिहार, नेतराम मच्छिरके, व्यंकट उके, निर्मल उपराडे, पुरुषोत्तम चंदनकर, गुमानसिंह उपराडे, जागेश्वर दसरिया, आडकूदास माहुले, पुरण दसरिया, पुरण डहारे, झनक दमाहे, ईश्वर बनोटे यांचे सहकार्य लाभले. संचालन भाजप महामंत्री राजेंद्र बडोले यांनी तर आभार महामंत्री मनोज बोपचे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)