शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

प्रौढ आणि म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या ताला-सुरात गातात. त्यांच्या गाण्यांमध्ये अर्थ व बोध असतो. गीताच्या स्वरूपात दंतकथा लपलेली असते. पारंपरिक जुन्या गाण्यांमध्ये गोडवा असून, मुलीच्या माहेरची व सासरची रुढी परंपरांचा उल्लेख असतो. मुलीला दिलेली शिकवण लपलेली असते. पहाटे उठून स्वयंपाक करणे, शिदोरी घेऊन जाणे व रोवणा संपला की माहेरी जाते. या गोष्टी त्यांच्या पारंपरिक गीतात समाविष्ट असतात.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातील चित्र : अजुनही जपली जातेय पंरपरा

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : यंदा पावसाने मधात दडी मारल्याने भात रोवणीला उशिरा सुरुवात झाली असून, मागील तीन-चार दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वत्र ठिकाणी भात रोवणीला वेेग आला आहे. रोवणीच्या कामात वाटू नये म्हणून मनोरंजन म्हणून जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणी करताना मजूर (महिला शेतकरी) प्रत्येक शेतावर दिसून येत आहेत.पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण क्षेत्र भात लागवडीचे असून, या भागातील शेतकऱ्यांना वेळेवर भात रोवणी व्हावी, यासाठी नियोजन करावे लागते. वर्षभराची कमाई भात रोवणीमध्ये दडलेली असून, शेतकरी कुटुंब महिनाभरापूर्वीपासून तयारीला लागत असतो. ८ जूनला मृग नक्षत्र लागताच धान पेरणीची तयारी, त्यानंतर पऱ्हे टाकून झाल्यानंतर एकीकडे नर्सरीची देखभाल तर दुसरीकडे शेतीला नांगरणी करण्याची कामे करतात. आधी सर्वत्र बैल नांगराने शेती वाहण्याचे कार्य केले जात असायचे; पण आता ट्रॅक्टरने नांगरणी व चिखलणी केली जाते. आजही अनेक छोटे शेतकरी बैल नांगराचा उपयोग करीत आहेत. यंदा मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस आला; परंतु ऐन रोवणीची वेळ येताच पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात वेळेवर पाऊस पडला तर सर्वत्र शेतीमध्ये रोवणीचे काम सुरू होते. एकीकडे नांगरणी तर दुसरीकडे पऱ्हे काढणे आणि सोबतच गाण्यांच्या तालावर रोवणी करताना प्रौढ महिला व युवा तरुणी सहभागी होतात. प्रौढ आणि म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या ताला-सुरात गातात. त्यांच्या गाण्यांमध्ये अर्थ व बोध असतो. गीताच्या स्वरूपात दंतकथा लपलेली असते. पारंपरिक जुन्या गाण्यांमध्ये गोडवा असून, मुलीच्या माहेरची व सासरची रुढी परंपरांचा उल्लेख असतो. मुलीला दिलेली शिकवण लपलेली असते. पहाटे उठून स्वयंपाक करणे, शिदोरी घेऊन जाणे व रोवणा संपला की माहेरी जाते. या गोष्टी त्यांच्या पारंपरिक गीतात समाविष्ट असतात.

मोऱ्या झाला कालबाह्य- शेतात काम करीत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी आधी मोऱ्या पांघरुन कामे करावी लागत असत. रोवण्या रोवणाऱ्या महिलांना दिवसभर चिखलात खपून राहावे लागत असून, पावसापासून वाचून राहण्यासाठी माहूर पानाच्या आच्छादान असलेल्या मोऱ्या उबदार वाटायच्या; परंतु आता उबदार माहुरपानाचा मोऱ्या कालबाह्य झाला असून, कमरेला प्लास्टिक बांधून रोवणी करतात. पाऊस आला की प्लास्टिकची पांघरून रोवणी करायची नाही तर मोकळे होऊन उत्साहात भात लागवड करायची. दरम्यान म्हाताऱ्या महिलांची गाणी संपली की तरुण मुली नव्या युगाची गीते गातांना रोवणी करताना दिसतात.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती