शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट

By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST

तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे

पावसाने फिरविली पाठ : बळीराजावर पुन्हा अस्मानी संकटआमगाव : तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तालुक्यात उशिरा का होईना दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी लावली व शेतकऱ्यांना पेरणीला वेळ मिळाला. शेतकऱ्यांनी शेतातील मशागत पूर्ण करुन बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून बियाण्यांची लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीचे बियाणे खरेदी केले. दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु बियाण्यांंची लागवड होऊन पंधरवडा संपला तरी पावसाने तालुक्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजाने पेरणी घातलेले भात बियाणे धान्य अंकुर निघण्याआधीच नष्ट झाले आहेत. अनेक शेतांमध्ये अंकुर निघाले परंतु पाण्याअभावी ते करपल्याचेही चित्र दिसून येत आहे. एकंदर पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या सापळ््यात शेतकरी अडकला आहे. तालुक्यात पाऊस समाधानकारक पडेल असा तर्क शेतकऱ्यांनी लावला होते. परंतु तालुक्यात १ जून ते २५ जून या कालावधीत दोनच दिवस १२४.६ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी बियाण्यांची लागवड करून घेतली. परंतु पावसाने ऐनवेळी पाठ फिरविल्याने बळीराजाची फसगत झाली. शेतातील बियाणे पाण्याअभावी नष्ट झाली असून बळीराजा आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. (शहर प्रतिनिधी)