शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट

By admin | Updated: June 26, 2014 23:20 IST

तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे

पावसाने फिरविली पाठ : बळीराजावर पुन्हा अस्मानी संकटआमगाव : तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तालुक्यात उशिरा का होईना दोन दिवस पावसाने समाधानकारक हजेरी लावली व शेतकऱ्यांना पेरणीला वेळ मिळाला. शेतकऱ्यांनी शेतातील मशागत पूर्ण करुन बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून बियाण्यांची लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीचे बियाणे खरेदी केले. दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. परंतु बियाण्यांंची लागवड होऊन पंधरवडा संपला तरी पावसाने तालुक्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे बळीराजाने पेरणी घातलेले भात बियाणे धान्य अंकुर निघण्याआधीच नष्ट झाले आहेत. अनेक शेतांमध्ये अंकुर निघाले परंतु पाण्याअभावी ते करपल्याचेही चित्र दिसून येत आहे. एकंदर पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या सापळ््यात शेतकरी अडकला आहे. तालुक्यात पाऊस समाधानकारक पडेल असा तर्क शेतकऱ्यांनी लावला होते. परंतु तालुक्यात १ जून ते २५ जून या कालावधीत दोनच दिवस १२४.६ मि.मी. पाऊस बरसल्याची नोंद आहे. पावसाचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी बियाण्यांची लागवड करून घेतली. परंतु पावसाने ऐनवेळी पाठ फिरविल्याने बळीराजाची फसगत झाली. शेतातील बियाणे पाण्याअभावी नष्ट झाली असून बळीराजा आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. (शहर प्रतिनिधी)