शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सुटबुटातील स्वच्छता दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:40 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले.

ठळक मुद्देदररोज दोन तास स्वच्छता अभियान : उच्च विद्याविभूषीत युवकाचा उपक्रम

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त ठरले. मात्र सध्यास्थितीत स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे पाहून एका तेवीस वर्षाच्या अधिकाऱ्यांने कुठलीही तमा न बाळगता गोरेगाव शहरात स्वच्छतेचा विडा उचलला. सुट बुटातील स्वच्छता दूताला पाहुन सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.विठ्ठल कवठे राहणार बोहिंदे (सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. ते गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल कवठे सप्टेंबर २०१८ ला गोरेगावच्या तालुका कृषी कार्यालयात रुजू झाले. तेव्हापासून ते सकाळी एक तास व सायंकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात.दोन्ही हातात मौजे, पाठीवर, लॅपटॉपची बॅग व एका हातात डस्टबिन घेवून जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात व तो कचरा कचरा पेटीत टाकतात. मागील चार महिन्यांपासृून ते गोरेगाव नगरवासीयांना सेवा देत आहे. रविवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान राबवितांना ते लोकमत प्रतिनिधीच्या नजरेस पडले. विठ्ठल कवठे यांनी आजपर्यंत बºयाच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले आहे.विशेष म्हणजे ते कुठेही गेले तरी त्यांची डस्टबिन त्यांची साथ सोडत नाही. शनिवारी (दि.२९) ला विदर्भ एक्सप्रेस या ट्रेनने गोंदियाला येत असताना त्यांनी रेल्वे गाडीत कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली. कर्तव्यावर असताना दोन तास तर सुटीच्या दिवशी चार तास स्वच्छता अभियान राबविणे असा त्यांचा नित्यक्रम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोहिंदे या खेडेगावात विठ्ठलचा जन्म झाला.ज्या समाजात आपण जगलो मोठे झालो त्या समाजासाठी काही घेणे अन देणे आहे. या विचाराचा त्याच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. ही संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगीतले.कार्यालयीन वेळेवर शासनाचे कामे करायची व उर्वरीत वेळेवर स्वच्छता अभियानात स्वत:ला झोकून द्यायचे या उर्मीने विठ्ठल काम करतो. गेल्या चार महिन्यापासून विठ्ठल गोरेगाव शहरात स्वच्छता अभियान राबवित असला तरी असंवेदनशिल गोरेगाववासीयांनी विठ्ठलाच्या दोन हाताला चार करण्याचे धाडस दाखविले नाही. आजही विठ्ठल एकटाच कचरा उचलतो एकटाच पुढे जातो मागे मात्र असंवेदनशिल लोकांचा साधा मागमुसही नाही.डस्टबिनची साथ सोडली नाही...सध्या काहीजण स्वच्छता अभियान हे केवळ फोटो सेशन पुरते करतात. त्यानंतर ते कधीही स्वच्छतेसाठी प्रयत्न करीेत नाही. मात्र विठ्ठल कवठे हे कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असतो. ते रस्त्यावरील व रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे.स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल तेव्हा मात्र ही भूमी कचरा मुक्त होईल.-विठ्ठल कवठे, मंडळ अधिकारी, कृषी कार्यालय गोरेगाव

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान