शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुटबुटातील स्वच्छता दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:40 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले.

ठळक मुद्देदररोज दोन तास स्वच्छता अभियान : उच्च विद्याविभूषीत युवकाचा उपक्रम

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त ठरले. मात्र सध्यास्थितीत स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे पाहून एका तेवीस वर्षाच्या अधिकाऱ्यांने कुठलीही तमा न बाळगता गोरेगाव शहरात स्वच्छतेचा विडा उचलला. सुट बुटातील स्वच्छता दूताला पाहुन सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.विठ्ठल कवठे राहणार बोहिंदे (सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. ते गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल कवठे सप्टेंबर २०१८ ला गोरेगावच्या तालुका कृषी कार्यालयात रुजू झाले. तेव्हापासून ते सकाळी एक तास व सायंकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात.दोन्ही हातात मौजे, पाठीवर, लॅपटॉपची बॅग व एका हातात डस्टबिन घेवून जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात व तो कचरा कचरा पेटीत टाकतात. मागील चार महिन्यांपासृून ते गोरेगाव नगरवासीयांना सेवा देत आहे. रविवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान राबवितांना ते लोकमत प्रतिनिधीच्या नजरेस पडले. विठ्ठल कवठे यांनी आजपर्यंत बºयाच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले आहे.विशेष म्हणजे ते कुठेही गेले तरी त्यांची डस्टबिन त्यांची साथ सोडत नाही. शनिवारी (दि.२९) ला विदर्भ एक्सप्रेस या ट्रेनने गोंदियाला येत असताना त्यांनी रेल्वे गाडीत कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली. कर्तव्यावर असताना दोन तास तर सुटीच्या दिवशी चार तास स्वच्छता अभियान राबविणे असा त्यांचा नित्यक्रम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोहिंदे या खेडेगावात विठ्ठलचा जन्म झाला.ज्या समाजात आपण जगलो मोठे झालो त्या समाजासाठी काही घेणे अन देणे आहे. या विचाराचा त्याच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. ही संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगीतले.कार्यालयीन वेळेवर शासनाचे कामे करायची व उर्वरीत वेळेवर स्वच्छता अभियानात स्वत:ला झोकून द्यायचे या उर्मीने विठ्ठल काम करतो. गेल्या चार महिन्यापासून विठ्ठल गोरेगाव शहरात स्वच्छता अभियान राबवित असला तरी असंवेदनशिल गोरेगाववासीयांनी विठ्ठलाच्या दोन हाताला चार करण्याचे धाडस दाखविले नाही. आजही विठ्ठल एकटाच कचरा उचलतो एकटाच पुढे जातो मागे मात्र असंवेदनशिल लोकांचा साधा मागमुसही नाही.डस्टबिनची साथ सोडली नाही...सध्या काहीजण स्वच्छता अभियान हे केवळ फोटो सेशन पुरते करतात. त्यानंतर ते कधीही स्वच्छतेसाठी प्रयत्न करीेत नाही. मात्र विठ्ठल कवठे हे कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असतो. ते रस्त्यावरील व रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे.स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल तेव्हा मात्र ही भूमी कचरा मुक्त होईल.-विठ्ठल कवठे, मंडळ अधिकारी, कृषी कार्यालय गोरेगाव

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान