शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाणी टंचाईवर बंधाऱ्याचे सोल्यूशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:39 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत वैनगंगा नदीवर डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली.

ठळक मुद्देमजीप्राची उपाययोजना : पाणी पातळीत एक फूट वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत वैनगंगा नदीवर डांगोर्ली येथे उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाणी टंचाईवर सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. परिणामी भूजल पातळीत सुध्दा घट झाली असून अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला मजीप्राच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतंर्गत शहरातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. यावर मात करण्यासाठी मजीप्राने डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीवर बंधारा तयार करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.मागील पंधरा दिवसांपासून शहराला केवळ एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. या बंधाºयामुळे पाणी अडवून राहिल्याने एक ते दीड फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान काही दिवस तरी पाणी टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. यंदा उन्हाळा चांगलाच तापत असल्याने पुढील दोन तीन महिने नदीला पाणी राहणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी आणण्याची मजीप्राची योजना आहे. मात्र तोपर्यंत पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मजीप्राच्या अधिकाºयांनी डांर्गोलीजवळ बंधारा तयार करण्याचे काम २० मार्चपासून सुरू केले असून ते काम जवळपास पूर्ण झाले आहे. या बंधाºयाच्या निर्मितीमुळे मागील चार पाच दिवसांत पाणी पातळीत एक दीड फुटाने वाढ झाली आहे. याचा लाभ कुडवा आणि कंटगीकला येथील पेरी अर्बन पाणी पुरवठा योजनेला होणार आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाय योजना सुरू करण्यात आल्या.डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीवर बंधारा तयार करण्यात आला. त्यामुळे पाणी पातळीत थोडी वाढ झाली आहे.- अभिजीत बागडे, सहायक अभियंता मजीप्रा

टॅग्स :Waterपाणी