शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

पाणी टंचाईवर सोलर पंप वरदान

By admin | Updated: March 22, 2016 02:20 IST

जिल्ह्यातील दुर्गम भाग, भौगोलिकदृष्ट्या विपरित परिस्थिती, वीज बिल भरण्याचीही सोय नसलेल्या ग्रामपंचायती,

गोंदिया : जिल्ह्यातील दुर्गम भाग, भौगोलिकदृष्ट्या विपरित परिस्थिती, वीज बिल भरण्याचीही सोय नसलेल्या ग्रामपंचायती, अशी एकूण परिस्थिती असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे आव्हान स्वीकारून ते पूर्ण केले. जिथे नळ योजना यशस्वी करणे अशक्यच झाले होते तिथे ‘सोलर पंपा’चा पर्याय रामबाण ठरत आहे. पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. शहरी भागात अगदी घरातील स्वयंपाकघरात थेट नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी ग्रामीण भागात आणि त्यातही दुर्गम अशा डोंगराळ, जंगलाने व्यापलेल्या आणि नक्षली कारवायांनी कायम दहशतीत वावरणाऱ्या लोकांना मात्र घोटभर पिण्याच्या पाण्यासाठीही कितीतरी पायपीट करावी लागते. काही भागात भौगोलिक परिस्थितीमुळे नळाची पाईपलाईन टाकणे शक्य होत नाही. काही ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य असले तरी त्या पाण्याचा कर भरणेही तेथील नागरिकांच्या ऐपतीत नाही. त्यामुळे वीज बिल भरणे अशक्य होऊन नळ योजनाच बंद पडण्याची स्थिती अनेक ठिकाणी निर्माण होते. मात्र आता यावर प्रभावी पर्याय ठरले आहे ते म्हणजे सौरउर्जेवर चालणाऱ्या हापशी.गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तब्बल २९२ सोलर पंप लावण्यात आले आहेत. सौरउर्जेवर चालणाऱ्या मोटरने या पंपामधील पाणी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत जाते. तेथून खाली लावलेल्या नळांमधून ते पाणी गावकऱ्यांना वापरता येते.नागरिकांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणे आणि वीज पुरवठ्याअभावी बंद पडणाऱ्या नळ योजनांची डोकेदुखी दूर करणे हा या सौरपंपांचा उद्देश होता. त्यात आता बऱ्याच प्रमाणात यश आल्याचे समाधान ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत यांत्रिकी विभागाचे उपअभियंता मानकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)‘जीपीएस सिस्टम’मधून होणार नवीन क्रांती४जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सौरपंपांना आता जीपीएस सिस्टम जोडण्याचा नवीन प्रयोग केला जात आहे. जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम पाच ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागात भारनियमन मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय सोलर पंपातून पाणी पुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती दुर्गम भागातील लोक जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. जीपीएस सिस्टममुळे मात्र सर्व प्रकारची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.सोलरपंपांना जीपीएस सिस्टम लावण्यासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणे झाले. आम्हाला काय अपेक्षित आहे हे त्यांना सांगितले. त्यानुसार काही ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. तो यशस्वी ठरल्यास राज्यासाठी तो दिशादर्शक ठरेल.- एन.एस.मानकरउपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प.गोदिया