शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

पाणी टंचाईवर सोलर पंप वरदान

By admin | Updated: March 22, 2016 02:20 IST

जिल्ह्यातील दुर्गम भाग, भौगोलिकदृष्ट्या विपरित परिस्थिती, वीज बिल भरण्याचीही सोय नसलेल्या ग्रामपंचायती,

गोंदिया : जिल्ह्यातील दुर्गम भाग, भौगोलिकदृष्ट्या विपरित परिस्थिती, वीज बिल भरण्याचीही सोय नसलेल्या ग्रामपंचायती, अशी एकूण परिस्थिती असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे आव्हान स्वीकारून ते पूर्ण केले. जिथे नळ योजना यशस्वी करणे अशक्यच झाले होते तिथे ‘सोलर पंपा’चा पर्याय रामबाण ठरत आहे. पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. शहरी भागात अगदी घरातील स्वयंपाकघरात थेट नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी ग्रामीण भागात आणि त्यातही दुर्गम अशा डोंगराळ, जंगलाने व्यापलेल्या आणि नक्षली कारवायांनी कायम दहशतीत वावरणाऱ्या लोकांना मात्र घोटभर पिण्याच्या पाण्यासाठीही कितीतरी पायपीट करावी लागते. काही भागात भौगोलिक परिस्थितीमुळे नळाची पाईपलाईन टाकणे शक्य होत नाही. काही ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य असले तरी त्या पाण्याचा कर भरणेही तेथील नागरिकांच्या ऐपतीत नाही. त्यामुळे वीज बिल भरणे अशक्य होऊन नळ योजनाच बंद पडण्याची स्थिती अनेक ठिकाणी निर्माण होते. मात्र आता यावर प्रभावी पर्याय ठरले आहे ते म्हणजे सौरउर्जेवर चालणाऱ्या हापशी.गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तब्बल २९२ सोलर पंप लावण्यात आले आहेत. सौरउर्जेवर चालणाऱ्या मोटरने या पंपामधील पाणी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत जाते. तेथून खाली लावलेल्या नळांमधून ते पाणी गावकऱ्यांना वापरता येते.नागरिकांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणे आणि वीज पुरवठ्याअभावी बंद पडणाऱ्या नळ योजनांची डोकेदुखी दूर करणे हा या सौरपंपांचा उद्देश होता. त्यात आता बऱ्याच प्रमाणात यश आल्याचे समाधान ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत यांत्रिकी विभागाचे उपअभियंता मानकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)‘जीपीएस सिस्टम’मधून होणार नवीन क्रांती४जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या सौरपंपांना आता जीपीएस सिस्टम जोडण्याचा नवीन प्रयोग केला जात आहे. जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम पाच ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागात भारनियमन मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय सोलर पंपातून पाणी पुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती दुर्गम भागातील लोक जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. जीपीएस सिस्टममुळे मात्र सर्व प्रकारची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.सोलरपंपांना जीपीएस सिस्टम लावण्यासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणे झाले. आम्हाला काय अपेक्षित आहे हे त्यांना सांगितले. त्यानुसार काही ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. तो यशस्वी ठरल्यास राज्यासाठी तो दिशादर्शक ठरेल.- एन.एस.मानकरउपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प.गोदिया