शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली.

ठळक मुद्देगृहभेटीच्या उपक्रमाला सुरूवात : हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीच्या प्रात्यक्षिकावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोव्हीड-१९ विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेची माहिती देत हात धुन्याचे प्रात्यक्षिक देण्याचे कार्य वडेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका भाग्यश्री केळवतकर करीत आहेत. यासाठी वडेगाव व परिसरातील गावात त्यानी गृहभेटीच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली. त्यामुळे गर्दी पसरू नये, यासाठी त्यानी ‘एकला चलो रे’ प्रमाणे घरोघरी जावून लोकांना हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन व कोरोना विषाणूबाबत, त्याच्या प्रतिबंधाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती देण्याचे कार्य सुरू केले. तसेच शिंकतांना व खोकतांना तोंडावर रूमाल घेतला पाहिजे.बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास हाताद्वारे अथवा एखाद्या वस्तुवर ड्रॉपलेट्स असल्यास नाक, तोंड व डोळ्याद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. कोणत्याही वस्तुला हात लावल्यावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साबणाने तांत्रिक पद्धतीने हात धुन्याचे मार्गदर्शन भाग्यश्री या नित्यनेमाने करीत आहेत. कोणताही ताप अथवा सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांकडे जाताना आपण आजारी असल्यास इतरांना संसर्ग होवू नये म्हणूनच मास्क वापरावे, अथवा मास्क वापरू नये असा सल्ला गावकऱ्यांना देत आहे. दरम्यान आपली रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.त्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला गृहभेटीतून त्यात देत आहेत. शासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच संपूर्ण देशात कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरातच राहावे, गर्दीच्या ठिकाणात जाण्याचे टाळावे तथा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या