शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरदिरंगाईने सहा गावातील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:43 IST

शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकºयांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देभूमिधारी वर्गीकरणाचे प्रकरण : योजनांपासून वंचित राहण्याची वेळ

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकऱ्यांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे. मात्र त्यांच्या अडचणीची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही. परिणामीे शेतकरी अडचणीत आले आहेत.शेतीची विक्री आणि बँकेतून कर्जाची उचल करण्यासाठी शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी १ मध्ये रुपांतर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ही सर्व कामे करता येत नाही. एखाद्या शेतकºयाला मुलीच्या लग्नाकरिता शेतीची विक्री किंवा बँकेकडे शेती गहाण ठेवून कर्जाची उचल करता येत नसल्याने या शेतकºयांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, पिपरी, कनेरी, मनेरी, कोकणा जमिदारी, चिंगी या गावातील शेतकरी मागील तीन चार वर्षांपासून शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी भूमिअभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायºया झिजवित आहेत. मात्र त्यांची समस्या मार्गी लागली नाही. जेव्हा शेतकरी ही समस्या घेवून भूमिअभिलेख कार्यालयात जातात तेव्हा त्यांना उपस्थित अधिकारी अभिलेख जीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन परत पाठवितात.हाच प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अभिलेख जीर्ण झाले असेल तर ते नवीन तयार करुन देण्याची तरतूद कायद्यात आहे. शासनाच्या २ जानेवारी २०१२ च्या परिपत्रकानुसार सदर काम गावनिहाय करुन दर शनिवारी त्याची यादी प्रकाशीत करण्याचे निर्देश दिले आहे. शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी शेतकºयांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना १० ते १५ दिवसांत कागदपत्रे तयार करुन देण्याचे निर्देश आहेत.मात्र यानंतरही भूमिअभिलेख आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकºयांना वेठीस धरुन कागदपत्रे देण्यास टाळटाळ करित आहेत. यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील तब्बल सहा गावातील हजारो शेतकरी अडचणित आले आहेत.या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.शेकडो रजिस्ट्री थांबल्याशेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्याचे काम होत नसल्याने या सहा गावांतील शेती विक्रीच्या शेकडो रजिस्ट्री थांबल्या असल्याची माहिती आहे. शेतीची विक्री अथवा कर्जाची उचल करता येत नसल्याने या गावातील शेतकरी मागील चार वर्षांपासून विविध आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडथळाशेत जमिनीचे भूमिस्वामी वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया शासकीय दप्तर दिंरगाईमुळे रखडली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांना विविध शैक्षणिक कामाची कागदपत्रे तयार करण्यास अडचणी येत आहे.