शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

दप्तरदिरंगाईने सहा गावातील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:43 IST

शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकºयांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देभूमिधारी वर्गीकरणाचे प्रकरण : योजनांपासून वंचित राहण्याची वेळ

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा गावांतील हजारो शेतकऱ्यांची मागील चार वर्षांपासून धडपड सुरू आहे. मात्र त्यांच्या अडचणीची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही. परिणामीे शेतकरी अडचणीत आले आहेत.शेतीची विक्री आणि बँकेतून कर्जाची उचल करण्यासाठी शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी १ मध्ये रुपांतर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ही सर्व कामे करता येत नाही. एखाद्या शेतकºयाला मुलीच्या लग्नाकरिता शेतीची विक्री किंवा बँकेकडे शेती गहाण ठेवून कर्जाची उचल करता येत नसल्याने या शेतकºयांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, पिपरी, कनेरी, मनेरी, कोकणा जमिदारी, चिंगी या गावातील शेतकरी मागील तीन चार वर्षांपासून शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी भूमिअभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायºया झिजवित आहेत. मात्र त्यांची समस्या मार्गी लागली नाही. जेव्हा शेतकरी ही समस्या घेवून भूमिअभिलेख कार्यालयात जातात तेव्हा त्यांना उपस्थित अधिकारी अभिलेख जीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन परत पाठवितात.हाच प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. अभिलेख जीर्ण झाले असेल तर ते नवीन तयार करुन देण्याची तरतूद कायद्यात आहे. शासनाच्या २ जानेवारी २०१२ च्या परिपत्रकानुसार सदर काम गावनिहाय करुन दर शनिवारी त्याची यादी प्रकाशीत करण्याचे निर्देश दिले आहे. शेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्यासाठी शेतकºयांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना १० ते १५ दिवसांत कागदपत्रे तयार करुन देण्याचे निर्देश आहेत.मात्र यानंतरही भूमिअभिलेख आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकºयांना वेठीस धरुन कागदपत्रे देण्यास टाळटाळ करित आहेत. यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील तब्बल सहा गावातील हजारो शेतकरी अडचणित आले आहेत.या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.शेकडो रजिस्ट्री थांबल्याशेत जमिनीचे भूमिधारी वर्ग क्रमांक २ मधून भूमिस्वामी वर्ग १ मध्ये परार्वतित करण्याचे काम होत नसल्याने या सहा गावांतील शेती विक्रीच्या शेकडो रजिस्ट्री थांबल्या असल्याची माहिती आहे. शेतीची विक्री अथवा कर्जाची उचल करता येत नसल्याने या गावातील शेतकरी मागील चार वर्षांपासून विविध आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडथळाशेत जमिनीचे भूमिस्वामी वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया शासकीय दप्तर दिंरगाईमुळे रखडली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मुलांना विविध शैक्षणिक कामाची कागदपत्रे तयार करण्यास अडचणी येत आहे.