शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
3
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
4
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
5
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
10
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
11
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
12
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
13
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
14
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
15
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
16
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
17
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
18
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
19
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
20
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका

सहा दिवसांपासून उपचारासाठी महिला ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता.

ठळक मुद्देगंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांनी न तपासताच नागपूरला केले रेफर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता. यावर उपविभागीय अधिकाºयांनी फटकारताच महिलेवर उपचार सुरू करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) उघडकीस आला.सालेकसा तालुक्यातील ग्राम पानगाव येथील भागरथा बाबुलाल तुमडाम (६०) यांना मुल नाही. परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्या खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नव्हत्या. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग असल्यामुळे त्या उपचारासाठी ५ फेब्रुवारी रोजी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल झाल्या. त्या दाखल झाल्या परंतु त्यांना बेड दिले गेले नाही. त्यामुळे त्यांना इमारतीच्या बाहेरच रहावे लागले. उपचारासाठी दाखल झालेल्या भागरथा यांचा उपचार करणे आवश्यक होते. परंतु येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला नाही. पाच दिवस लोटूनही त्यांना कोणत्याही डॉक्टरने तपासले नाही. ५ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या भागरथावर उपचार न करता शनिवारी (दि.१०) डॉ. खंडेलवाल यांनी त्यांना येथे उपचार होऊ शकत नाही, तुम्ही नागपूरला जा असा सल्ला देत नागपूरला रेफर केले.पाच दिवस गंगाबाईत दाखल असलेल्या महिलेला एकाही डॉक्टरने पाहिले नाही. हे त्यांच्या उपचाराच्या कागदावरून स्पष्ट होते. या महिलेला मदत करण्यासाठी गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयातील एक महिला गेली होती. त्या कार्यालयात नाही कुठे गेल्या याची चौकशी इतर कर्मचाºयांकडून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली. तेव्हा त्यांना सदर महिला कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी गेल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात पाच दिवस रूग्ण रूग्णालयात असून देखील डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही बाब उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी जिल्हा शल्य डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या लक्षात आणून दिली. परंतु त्यांनी ही बाब वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या अखत्यारित असल्याचे सांगितले. वालस्कर यांनी ही बाब पुन्हा आ. गोपालदास अग्रवाल यांच्या कानावर टाकली.आ. अग्रवाल यांनी त्वरीत डॉ.सायास केंद्रे यांना फोन करून त्या महिलेकडे लक्ष देण्यास सांगितले. डॉ. केंद्रे सुट्टीवर असल्याने ते आजच परतत असताना त्यांना या प्रकरणाची माहिती झाली.ते रूग्णालयात आल्यावर त्या रूग्णाची शोधाशोध केली. परंतु त्या रूग्णाला डॉ. केंदे्र यांच्या येण्यापूर्वीच सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे त्या घरी जाण्याच्या बेतात उपविभागीय कार्यालयाच्या रस्त्यावर आल्या. याच उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्या रूग्ण महिलेच्या नात्यात असल्याने जातांना त्यांना भेटण्यासाठी त्या रूग्ण या ठिकाणी आल्या होत्या. परंतु उपविभागीय अधिकारी वालस्कर यांच्या प्रयत्नाने डॉ. केंदे्र यांनी महिलेला पुन्हा गंगाबाईत दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले.