शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सहा दिवसांपासून उपचारासाठी महिला ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता.

ठळक मुद्देगंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांनी न तपासताच नागपूरला केले रेफर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता. यावर उपविभागीय अधिकाºयांनी फटकारताच महिलेवर उपचार सुरू करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) उघडकीस आला.सालेकसा तालुक्यातील ग्राम पानगाव येथील भागरथा बाबुलाल तुमडाम (६०) यांना मुल नाही. परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्या खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नव्हत्या. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग असल्यामुळे त्या उपचारासाठी ५ फेब्रुवारी रोजी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल झाल्या. त्या दाखल झाल्या परंतु त्यांना बेड दिले गेले नाही. त्यामुळे त्यांना इमारतीच्या बाहेरच रहावे लागले. उपचारासाठी दाखल झालेल्या भागरथा यांचा उपचार करणे आवश्यक होते. परंतु येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला नाही. पाच दिवस लोटूनही त्यांना कोणत्याही डॉक्टरने तपासले नाही. ५ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या भागरथावर उपचार न करता शनिवारी (दि.१०) डॉ. खंडेलवाल यांनी त्यांना येथे उपचार होऊ शकत नाही, तुम्ही नागपूरला जा असा सल्ला देत नागपूरला रेफर केले.पाच दिवस गंगाबाईत दाखल असलेल्या महिलेला एकाही डॉक्टरने पाहिले नाही. हे त्यांच्या उपचाराच्या कागदावरून स्पष्ट होते. या महिलेला मदत करण्यासाठी गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयातील एक महिला गेली होती. त्या कार्यालयात नाही कुठे गेल्या याची चौकशी इतर कर्मचाºयांकडून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली. तेव्हा त्यांना सदर महिला कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी गेल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात पाच दिवस रूग्ण रूग्णालयात असून देखील डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही बाब उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी जिल्हा शल्य डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या लक्षात आणून दिली. परंतु त्यांनी ही बाब वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या अखत्यारित असल्याचे सांगितले. वालस्कर यांनी ही बाब पुन्हा आ. गोपालदास अग्रवाल यांच्या कानावर टाकली.आ. अग्रवाल यांनी त्वरीत डॉ.सायास केंद्रे यांना फोन करून त्या महिलेकडे लक्ष देण्यास सांगितले. डॉ. केंद्रे सुट्टीवर असल्याने ते आजच परतत असताना त्यांना या प्रकरणाची माहिती झाली.ते रूग्णालयात आल्यावर त्या रूग्णाची शोधाशोध केली. परंतु त्या रूग्णाला डॉ. केंदे्र यांच्या येण्यापूर्वीच सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे त्या घरी जाण्याच्या बेतात उपविभागीय कार्यालयाच्या रस्त्यावर आल्या. याच उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्या रूग्ण महिलेच्या नात्यात असल्याने जातांना त्यांना भेटण्यासाठी त्या रूग्ण या ठिकाणी आल्या होत्या. परंतु उपविभागीय अधिकारी वालस्कर यांच्या प्रयत्नाने डॉ. केंदे्र यांनी महिलेला पुन्हा गंगाबाईत दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले.