शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सहा दिवसांपासून उपचारासाठी महिला ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:31 IST

घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता.

ठळक मुद्देगंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांनी न तपासताच नागपूरला केले रेफर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरात अठराविश्वे दारिद्रय, हातात कवडी नाही. परंतु गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने ती उपचारासाठी बाई गंगाबाई स्त्री रूगणालयात आली. मात्र सदर महिलेवर मागील सहा दिवसांपासून उपचार करण्यात आला नव्हता. यावर उपविभागीय अधिकाºयांनी फटकारताच महिलेवर उपचार सुरू करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) उघडकीस आला.सालेकसा तालुक्यातील ग्राम पानगाव येथील भागरथा बाबुलाल तुमडाम (६०) यांना मुल नाही. परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्या खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नव्हत्या. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग असल्यामुळे त्या उपचारासाठी ५ फेब्रुवारी रोजी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल झाल्या. त्या दाखल झाल्या परंतु त्यांना बेड दिले गेले नाही. त्यामुळे त्यांना इमारतीच्या बाहेरच रहावे लागले. उपचारासाठी दाखल झालेल्या भागरथा यांचा उपचार करणे आवश्यक होते. परंतु येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला नाही. पाच दिवस लोटूनही त्यांना कोणत्याही डॉक्टरने तपासले नाही. ५ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या भागरथावर उपचार न करता शनिवारी (दि.१०) डॉ. खंडेलवाल यांनी त्यांना येथे उपचार होऊ शकत नाही, तुम्ही नागपूरला जा असा सल्ला देत नागपूरला रेफर केले.पाच दिवस गंगाबाईत दाखल असलेल्या महिलेला एकाही डॉक्टरने पाहिले नाही. हे त्यांच्या उपचाराच्या कागदावरून स्पष्ट होते. या महिलेला मदत करण्यासाठी गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयातील एक महिला गेली होती. त्या कार्यालयात नाही कुठे गेल्या याची चौकशी इतर कर्मचाºयांकडून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली. तेव्हा त्यांना सदर महिला कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी गेल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात पाच दिवस रूग्ण रूग्णालयात असून देखील डॉक्टरांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही बाब उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी जिल्हा शल्य डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या लक्षात आणून दिली. परंतु त्यांनी ही बाब वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या अखत्यारित असल्याचे सांगितले. वालस्कर यांनी ही बाब पुन्हा आ. गोपालदास अग्रवाल यांच्या कानावर टाकली.आ. अग्रवाल यांनी त्वरीत डॉ.सायास केंद्रे यांना फोन करून त्या महिलेकडे लक्ष देण्यास सांगितले. डॉ. केंद्रे सुट्टीवर असल्याने ते आजच परतत असताना त्यांना या प्रकरणाची माहिती झाली.ते रूग्णालयात आल्यावर त्या रूग्णाची शोधाशोध केली. परंतु त्या रूग्णाला डॉ. केंदे्र यांच्या येण्यापूर्वीच सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे त्या घरी जाण्याच्या बेतात उपविभागीय कार्यालयाच्या रस्त्यावर आल्या. याच उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्या रूग्ण महिलेच्या नात्यात असल्याने जातांना त्यांना भेटण्यासाठी त्या रूग्ण या ठिकाणी आल्या होत्या. परंतु उपविभागीय अधिकारी वालस्कर यांच्या प्रयत्नाने डॉ. केंदे्र यांनी महिलेला पुन्हा गंगाबाईत दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले.