शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सहा मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 21:33 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे कार्य : शिक्षणापासून मुले वंचित राहू नये यासाठी खटाटोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मागून पोट भरणाऱ्या व बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, अर्जुनी-मोरगाव व गोंदिया या दोन तालुक्यांत सहा शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल कण्यात आले आहे.एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत तजविज केली. तसेच स्थानिक प्राधीकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे.यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात शहरा लगतच्या ग्राम कुडवा व रेल्वेस्थानक, तिरोडा तालुक्यातील ग्राम काचेवानी, मुंडीकोटा व सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे भीक मागणाऱ्या, मांग-गारुडी, लोहार व फिरणाऱ्या नाथजोगींच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा एक हजार रूपये मिळवा’ असे जनजागृती करणारे फलकही लावले आहे.शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. २१ ऑगस्ट रोजी ग्राम कुडवा येथील मुलांच्या शाळेत चार शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यात आले. तर २३ ऑगस्ट रोजी भविष्य सांगणाऱ्यांच्या दोन मुलींना अर्जुनी-मोरगाव येथील शिक्षण विभागाच्या चमूने शाळेत घातले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील शाळेत त्यांना दाखल करण्यात आले असून शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहे. केंद्रप्रमुख एम.बी. रतनपुरे व इतरांनी त्यांना दाखल करून घेतले.जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरूअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम कुंभीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यात आलेल्या मुलींची नावे करीमा ज्ञानेश्वर गुजर व आचल संजय वालके (रा. सेलू, कळमेश्वर, जि. नागपूर) अशी आहे. तर कुडवा येथील शाळेत दाखल करण्यात आलेल्या चार मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. जिल्हाभरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू आहे.

टॅग्स :Educationशिक्षण