शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

साहेब... आम्ही शेतकरी नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:40 IST

तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देभाडे तत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सवाल : मदतीपासून डावलण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कृषी आणि महसूल विभागाकडून या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यास मनाई करुन मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या शेतकºयांनी साहेब आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.सिंचन विभागाच्या मध्यम प्रकल्पातंर्गत येणाऱ्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पातील पाणी कमी झाल्यानंतर या क्षेत्रातील जमिन शेतीसाठी निविदा काढून शेतकऱ्यांना भाडेतत्वावर दिली जाते. मागील अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे सिंचन विभागाला महसूल आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादन घेवून चार पैसे वाचविण्यास मदत होते. बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात जवळपास १ हजार हेक्टरवर जमिन आहे.पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी राहत असल्याने ती उपयोगात येत नाही. मात्र नोव्हेबरनंतर या प्रकल्पातील पाणी कमी झाल्यावर हे क्षेत्र कोरडे पडते. त्यामुळे सिंचन विभागाकडून ही जमिन चार ते पाच महिन्यांसाठी भाडेतत्वावर दिली जाते. जमिनीच्या क्षेत्रानुसार १ ते ५० हजार रुपयांपर्यंत त्याचे प्रती हेक्टरी दर आहेत. यंदा तिरोडा तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रातील केशव उईके, नानक बघेले, वासुदेव वाळे, दिलीप उईके, प्रल्हाद कोडापे, जयपाल किरसान, गोपाल किरसान, प्रितम पटले, सोमा रहांगडाले, हेमराज रहांगडाले, राजेंद्र फरकुंडे, विरम परतेती यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी बोदलकसा प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती केली आहे. यापैकी काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, वटणा, मक्का तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. सुदैवाने यंदा रब्बीसाठी अनुकुल वातावरण असल्याने ही पिके देखील चांगली डोलदार आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. खरीपातील कसर रब्बी भरुन निघेल अशी त्यांना आशा होती. मात्र मंगळवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके भूईसपाट झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे शेकडो शेतकरी संकटात आले आहे.त्यांच्याजवळ जी काही जमापुंजी होती ती देखील त्यांनी खर्ची घातल्याने आता कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हेच काय कमी म्हणून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडे केली.तेव्हा त्यांनी तुम्ही भाडेतत्वावर शेती केली असून तुमच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगत पंचनामे करण्यास नकार दिला.त्यामुळे गारपिटीच्या माऱ्याने आधीच जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना पुन्हा वेदना देण्याचे काम प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले असून भाडेतत्वावर शेती केली म्हणून आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि प्रशासनाला केला.जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे घेतली धावतलाठी व कृषी सहाय्यकांनी या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार दिला.त्यामुळे या शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी आणि कृषी सहाय्यकांना दिल्याची माहिती आहे.मदत न मिळाल्यास आंदोलनकेवळ भाडेतत्वावर शेती केली म्हणून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. मात्र आमच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे न करुन नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.

टॅग्स :Farmerशेतकरी