शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साहेब... आम्ही शेतकरी नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:40 IST

तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देभाडे तत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सवाल : मदतीपासून डावलण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मंगळवारी (दि.१३) झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाचा फटका बसला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कृषी आणि महसूल विभागाकडून या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यास मनाई करुन मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या शेतकºयांनी साहेब आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.सिंचन विभागाच्या मध्यम प्रकल्पातंर्गत येणाऱ्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा सिंचन प्रकल्पातील पाणी कमी झाल्यानंतर या क्षेत्रातील जमिन शेतीसाठी निविदा काढून शेतकऱ्यांना भाडेतत्वावर दिली जाते. मागील अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे सिंचन विभागाला महसूल आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादन घेवून चार पैसे वाचविण्यास मदत होते. बोदलकसा सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रात जवळपास १ हजार हेक्टरवर जमिन आहे.पावसाळ्यात या प्रकल्पात पाणी राहत असल्याने ती उपयोगात येत नाही. मात्र नोव्हेबरनंतर या प्रकल्पातील पाणी कमी झाल्यावर हे क्षेत्र कोरडे पडते. त्यामुळे सिंचन विभागाकडून ही जमिन चार ते पाच महिन्यांसाठी भाडेतत्वावर दिली जाते. जमिनीच्या क्षेत्रानुसार १ ते ५० हजार रुपयांपर्यंत त्याचे प्रती हेक्टरी दर आहेत. यंदा तिरोडा तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या क्षेत्रातील केशव उईके, नानक बघेले, वासुदेव वाळे, दिलीप उईके, प्रल्हाद कोडापे, जयपाल किरसान, गोपाल किरसान, प्रितम पटले, सोमा रहांगडाले, हेमराज रहांगडाले, राजेंद्र फरकुंडे, विरम परतेती यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी बोदलकसा प्रकल्पाच्या क्षेत्रात भाडेतत्वावर शेती केली आहे. यापैकी काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, वटणा, मक्का तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली. सुदैवाने यंदा रब्बीसाठी अनुकुल वातावरण असल्याने ही पिके देखील चांगली डोलदार आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. खरीपातील कसर रब्बी भरुन निघेल अशी त्यांना आशा होती. मात्र मंगळवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके भूईसपाट झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे शेकडो शेतकरी संकटात आले आहे.त्यांच्याजवळ जी काही जमापुंजी होती ती देखील त्यांनी खर्ची घातल्याने आता कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. हेच काय कमी म्हणून त्यांना कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेकडून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडे केली.तेव्हा त्यांनी तुम्ही भाडेतत्वावर शेती केली असून तुमच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगत पंचनामे करण्यास नकार दिला.त्यामुळे गारपिटीच्या माऱ्याने आधीच जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना पुन्हा वेदना देण्याचे काम प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले असून भाडेतत्वावर शेती केली म्हणून आम्ही शेतकरी नाही का? असा सवाल शासन आणि प्रशासनाला केला.जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे घेतली धावतलाठी व कृषी सहाय्यकांनी या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार दिला.त्यामुळे या शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी आणि कृषी सहाय्यकांना दिल्याची माहिती आहे.मदत न मिळाल्यास आंदोलनकेवळ भाडेतत्वावर शेती केली म्हणून गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जात आहे. मात्र आमच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे न करुन नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.

टॅग्स :Farmerशेतकरी