शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

साहेब, आम्हाला गावाला जाऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे हाताला काम नाही खिशात पैसे नाही. पोट भरावे कसे या विवंचनेत असलेल्या त्या युवकांनी घराची वाट धरली.

ठळक मुद्देतेलगंणातील मजुरांची व्यथा : लॉकडाऊनमुळे ३५ दिवसांपासून अडकले

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कोरोनामुळे जगण्यातले संदर्भ बदलले आणि गावाच्या ओढीने सारेच मजूर गावजवळ करू लागले. यातच दीडशे युवकांचा एक जत्था गोंदियावरून गोरेगाव मार्ग तेलंगणाला जाण्यासाठी निघाला पण रात्रीच पोलिसांनी गोरेगावात त्यांना अडवून त्या युवकांना क्वारंटाईन केले. याला आता एक महिण्याचा कालावधी लोटूनही त्या युवकांना प्रशासनाने न सोडल्यामुळे ते युवक आता आम्हाला गावाला जाऊ द्या हो असा टाहो फोडत प्रशासनाला हात जोडत गावी सोडून द्या, आई वडील खूप रडतात अशी भावनीक घालत आहेत.तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे हाताला काम नाही खिशात पैसे नाही. पोट भरावे कसे या विवंचनेत असलेल्या त्या युवकांनी घराची वाट धरली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वत्र वाहतूक बदं करण्यात आली. रेल्वे बसेस बदं करण्यात आले. या परिस्थितीत त्या युवकांनी मिळेल त्या साधनाने घराची वाट धरली. ३१ मार्चला गोदियावरून गोरेगावात दाखल होताच पोलिसांनी त्यांना अडविले आणि त्या युवकांची गावाकडे जाण्याची आशा धुसर झाली. त्या सर्व युवकांना येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली.गोरेगाव शहरात दीडशे युवकांचे जत्थे स्थानिक जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन होताच शहरांतील दानविर, सामाजिक संघटना, धावून आल्या त्या दीडशे युवकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. पुढे तेरा दिवस खालसा सेवा दलने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. सध्या नगर पंचायततर्फे नास्ता,चहा व जेवणाची व्यवस्था करीत आहे.युवकांना झोपण्यासाठी बेड, पंखा, आंघोळीसाठी पाणी या सर्व गोष्टींची व्यवस्था नगर पंचायत आणि संबधित विभागाने वेळीच केलीे. पण ३५ दिवसांचा कालावधी लोटल्यामुळे गावाकडील आठवनीने आसुसलेले युवक काहीही ऐकण्यास तयार नाही. त्याचा उद्रेक सोमवारी (दि.४) झाला. गावी जाऊ द्या चा टाहो फोडत मोठया प्रमाणावर युवकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच तहसीलदार नरेश वेदी व पोलिसांनी त्या युवकांना तेलगंणा प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे सांगत परवानगी मागितली असल्याचे पत्र दाखिवले. काही वेळ युवकांनी रस्त्यावर बसून गोंधळ घालून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने त्या युवकांना तेलगंणा राज्यात पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून बुधवारी त्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या